“धर्म अनेक आहेत, पण त्या सगळ्यांच्या वरचा धर्म भारताचा प्राण आहे”, मोहन भागवतांचं भाष्य!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या निमित्ताने नागपूरमध्ये भाषण केले. संघाच्या १०० व्या वर्षात पदार्पणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भागवत यांनी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानावर भाष्य केले आणि तो मानवधर्म व विश्वधर्म असल्याचे सांगितले. त्यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचे महत्त्वही अधोरेखित केले आणि OTT प्लॅटफॉर्म्सवरील अश्लीलतेवर तीव्र आक्षेप नोंदवला.