“राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत हीच लोकशाहीची परीक्षा”, नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी लोकशाहीत राजाने प्रखर विचार सहन करावेत असे सांगितले. गडकरींनी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सर्वधर्मसमभाव असा स्पष्ट केला. भारतीय संस्कृतीत सहिष्णुता आणि विश्वकल्याण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. गडकरींनी व्यक्ती धर्म, भाषा, प्रांतामुळे नव्हे तर कर्तृत्वाने मोठा होतो असेही सांगितले.