KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धकाने ‘हे’ कारण देत सोडला खेळ, अमिताभ बच्चन झाले स्तब्ध
‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय क्विझ शोचे १६ वे पर्व सुरू आहे, ज्याचे होस्ट अमिताभ बच्चन आहेत. या पर्वात कोलकात्याहून आलेले डॉ. नीरज सक्सेना यांनी सहा लाख ४० हजार रुपये जिंकूनही इतर स्पर्धकांना संधी मिळावी म्हणून शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे अमिताभ बच्चन आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. अमिताभ बच्चन यांनी नीरज सक्सेना यांच्या मनाचा मोठेपणा कौतुकाने मान्य केला.