Infosys Co-Founder Nandan Nilekani on Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वेगाने विकसित होत आहे. माणसाची अनेक कामे एआयच्या मदतीने चुटकीसरशी होऊ लागली आहेत. त्यामुळी येत्या काही वर्षांत एआयमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील, अशी भिती सर्वांनाच सतावतेय. दरम्यान, इन्फोसिसचे सह-संस्थापक व चेअरमन नंदन निलेकणी यांनी एआयबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य करून लोकांमधील एआयची भिती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. “एआय कितीही उपयुक्त असलं तरी अनेक मानवी गुणांना पर्याय नाही”, असं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, “सहानुभूती, नेतृत्व, सहकार्य व सर्जनशीलता हे मानवी गुण नेहमीच महत्त्वाचे राहतील. एआय या गुणांची जागा घेऊ शकत नाही. एआय जगात कितीही विकसित झालं तरी पाच जणांना एकत्र करून काम पूर्ण करता येत नसेल तर एआय मानवावर मात करू शकणार नाही”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा