भारतात सध्या सर्वाधिक विक्री होणारी वस्तू म्हणजे मोबाईल. जगभरातील मोबाईल उत्पादकांच्या नजरा सध्या भारतावर खिळलेल्या आहेत, कारण हीच जगातील सर्वात मोठी मोबाईल बाजारपेठ आहे. शिवाय ही सर्व प्रकारच्या मोबाईल मॉडेलच्या गरजा भागविणारी अशी बाजारपेठ आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांना असे वाटते की, सुयोग्य बाजारपेठ आहे. इथे आयुष्यात प्रथमच फोन वापरणारे आजी- आजोबा किंवा इतर मंडळीही आहेत. स्मार्टफोनच्या प्रेमात असलेला तरुण वर्गही आहे आणि आपले व्यावसायिक काम स्मार्टफोनच्या मार्फत करणारी मंडळीही आहेत. स्मार्टफोनच्या बाजारपेठेत सॅमसंग आघाडीवर आहे (आणि उत्पादनाच्या तक्रारींच्या बाबतीतही) तर एकेकाळी आघाडीवर असलेली नोकिया खूपच पिछाडीवर आहे. बाजारपेठेत तग धरून राहण्यासाठी मध्यंतरी नोकियाने दोन प्रकारचे प्रयत्न केले. सर्वप्रथम त्यांनी िवडोज आठ या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे लुमिआ हे स्मार्टफोन्स बाजारपेठेत आणले. लुमिआला चांगलीच लोकप्रियता मिळाली. अनेक ग्राहक तर त्याच्या डिझाईनच्याही प्रेमात होते. पण लुमिआची किंमत न परवडणारा असाही एक मोठा वर्ग भारतात आहे, त्यांच्यासाठी नोकियाने आशा नावाची मालिका बाजारात आणली. ती त्या वर्गात चांगली लोकप्रियही आहे. मात्र सर्वानाच सध्याच्या जमान्यात हवा असतो तो स्मार्टफोनचा अनुभव. शिवाय स्मार्टफोन हातात असणे हे स्टेटस सिम्बॉलही झाले आहे. हे सारे लक्षात घेऊनच आता नोकियाने प्रत्यक्षात फीचर फोनच्या किंमतीत स्मार्टफोनचा अनुभव देणारा असा नोकिया आशा ५०१ बाजारात आणला आहे. हा फोन स्वस्तातील अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षाही तुलनेने बराच स्वस्त आहे. रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आलेले याचे काही विशेष पुढीलप्रमाणे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा