सध्या एकापेक्षा एक अप्रतिम व आकर्षक स्मार्टफोन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत दररोज दाखल होत आहेत. ज्या कंपन्या ही मॉडेल्स बाजारपेठेत आणतात, त्या कंपन्यांचे नाव अनेकदा भारतात माहीतही नसते. पण तरीही या सर्व कंपन्यांना त्यांचे उत्पादन भारतात जबरदस्त खपणार, याची खात्री वाटत असते. असे काय आहे या भारतीय बाजारपेठेत की, त्यामुळे या सर्व कंपन्यांना ही खात्री वाटते आणि त्या आत्मविश्वासाने या क्षेत्रात उतरत आहेत?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की, भारतीय बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठी मोबाइल बाजारपेठ आहे हे या कंपन्यांनी इथे येण्याचे एकमात्र कारण नाही. तर या बाजारपेठेत नानाविध प्रकारचा आणि आर्थिक क्षमता असलेला असा ग्राहक वर्ग आहे. यात मध्यमवर्ग हा खूप मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यातही एक निम्नमध्यमवर्ग असा आहे की, ज्याला मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गाकडून वापरल्या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा