ठाणे : महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात महिन्याभरात २१ नवजात बालके मरण पावल्याची माहिती समोर आली आहे. या नवजात बालकांचे वजन कमी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

कळवा रुग्णालयात लहान मुलांसाठी अतिदक्षता विभागात ३० खाटा आहेत. जून महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५१२ महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यातील ९० महिलांची  प्रसूतीसाठी नोंदणी करण्यात आली होती. एकूण २९४ महिलांची सिझेरियन प्रसूती झाली. या प्रसूती झालेल्या महिलांच्या आठ नवजात बालकांचा ४८ तासांत मृत्यू झाला.

child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Queues of citizens, Dombivli Civic Facility Center,
कर्मचाऱ्यांअभावी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा
Case against five persons including owner in case of accident in glass factory
काच कारखान्यातील दुर्घटनेप्रकरणी मालकासह पाचजणांविरुद्ध गुन्हा, येवलेवाडीतील दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Buldhana, brother sister poisoning Buldhana,
विषबाधेमुळे अल्पवयीन बहीण-भावाचा मृत्यू; आदिवासी कुटुंबातील ८ सदस्यांना…
person who stole jewellery from devotees was arrested in Lalbagh
लालबागमध्ये भाविकांचे दागिने चोरणाऱ्याला अटक, आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी
Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?

हेही वाचा >>> डोंबिवलीजवळील पिसवलीत विजेच्या धक्क्याने सात जनावरांचा मृत्यू

ठाणे ग्रामीण भागातील व पालघर जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती असलेल्या महिला जून महिन्यात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. या महिलांच्या ९० नवजात बालकांचे वजन एक किलो वजनापेक्षा कमी होते. त्यामुळे मृत्यू झालेल्या २१ बालकांपैकी १९ बालके शहराबाहेरील होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

उपाययोजना फोल?

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात याच रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने रुग्णालयाचा ताण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. आता एका महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनाच्या नवीन उपाययोजना फोल ठरल्या का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

या प्रकरणाचा अहवाल रुग्णालय प्रशासनाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश बारोट यांच्याकडून मागविण्यात आला आहे. मृत्यू पावलेल्या नवजात बालकांचे वजन हे दीड किलोपेक्षा कमी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. परंतु, आता याची चौकशी केली जाईल आणि याचा अहवाल  सभागृहसमोर सादर केला जाईल. – उमेश बिरारी, उपायुक्त, ठाणे महापालिका.