कबुतरांना उघड्यावर खाद्य पदार्थ टाकू नका, असे आवाहन करत तसे करताना आढळून आले तर पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. या संबंधीचे फलक संपुर्ण शहरात प्रभाग समितींच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत. कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे आजार होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे पालिकेने फलकांवर स्पष्ट केलेले आहे. यामुळे पालिका विरुद्ध प्राणीप्रेमी असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा- ठाण्यात रविवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन; सुमारे ५ हजार पदांसाठी होणार मुलाखती

five thousand rupees fine Throwing food on the street nagpur city corporation
धडक कारवाई! अन्न रस्त्यावर फेकणे पडले महागात; ५ हजारांचा दंड…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
no action taken against project officer shubham gupta guilty in cow allocation scam
गायवाटप घोटाळ्यात दोषी आयएएस अधिकारी गुप्ता यांच्यावर कारवाई केव्हा? प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईवर…
Violation of High Court order servant stopped from feeding stray dogs
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन, भटक्या श्वानांना खाद्य देण्यापासून सेवकाला रोखले
Commissioner and Administrator of Ichalkaranji Municipal Corporation Omprakash Divate
इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकांचा पदभार काढून घेतला
bmc impose waste management charges in Mumbai
मुंबईत कचऱ्यावर साडेसात हजारांपर्यंत शुल्क; खर्च वाढल्याने पालिकेकडून प्रस्ताव
Nagpur to Sikandarbad Vande Bharat Express coaches to be reduced
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद,डबे कमी होणार
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी

ठाणे महापालिका क्षेत्रातील काही चौक तसेच मोकळ्या जागांवर कबुतरांना खाद्य पदार्थ टाकले जाते. इमारतींच्या खिडक्यांमध्येही कबुतर आसरा घेत असून त्याठिकाणी कबुतरांना अनेक रहिवाशी खाद्य पदार्थ टाकतात. परंतु याच कबुतरांपासून सावधान राहण्याचे आवाहन करत त्यांना खाद्य पदार्थ टाकण्यास पालिका प्रशासनाने मनाई केली आहे. या संबंधीचे फलक शहरातील विविध भागात पालिका प्रभाग समितींच्या माध्यमातून लावण्यात आलेले असून हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कबुतरांना उघड्यावर खाद्य पदार्थ टाकू नका असे आवाहन या फलकांद्वारे करण्यात आलेले असून त्याचबरोबर खाद्य पदार्थ टाकताना आढळून आल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. यापुर्वी करोना काळातही पालिका प्रशासनाने अशा प्रकारचे फलक लावले होते. मात्र, त्याच्या अंमलबजावणीबाबत पालिकेकडून ठोस कारवाई होताना दिसून आली नाही. त्यानंतर पालिका प्रशासनाने आता पुन्हा अशाचप्रकारची फलकबाजी सुरु केली आहे.

हेही वाचा- “आपल्याकडे निष्ठेची तर, त्यांच्याकडे सौदेबाजीची मंडळी”; माजी आमदार सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

खाद्य पदार्थ टाकण्यास बंदी का ?

कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमेनिया’चा (एचपी) आजार बळवण्याचे प्रमाण पुण्यासह मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फुफ्फुसांशी संबंधित आझार झालेल्यांमध्ये ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमेनिया’ हा आजार होण्याचे सर्वाधिक प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. त्यामुळेच कबुतरांना उघड्यावर खाद्य पदार्थ टाकू नका असे पालिका प्रशासनाने फलकांद्वारे म्हटले आहे.

Story img Loader