ठाणे: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलिस ई- चलानद्वारे दंडात्मक कारवाई करतात. हा दंड अनेक वाहन चालक प्रलंबित ठेवत असून त्याच्या वसुलीसाठी लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. आज, शनिवारी सकाळी १०.३० ते ५.३० यावेळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे ही लोकअदालत होणार आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात येतात. सिग्नल ओलांडणे, थांब रेषेवर वाहन नेणे, विना शिरस्त्राण दुचाकी चालविणे, दुचाकीवर तीन जण प्रवास करणे अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करतात. ई-चलानद्वारे ही कारवाई करण्यात येते.

Undisciplined drivers fined Rs 18 lakh 90 thousand Traffic Department takes action
बेशिस्त वाहनचालकांना १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड; वाहतूक विभागाची कारवाई
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Cash worth Rs 16 lakh found in house of corrupt employee of Kalyan Dombivali Municipality
कल्याण डोंबिवली पालिकेतील लाचखोर कर्मचाऱ्याच्या घरात सापडली १६ लाखाची रोकड
MahaRERA Urges District Collector To Take Action Against Defaulting Developers
सहा विकासकांकडे २४९ कोटी थकीत; वसुलीसाठी महारेराकडून उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
cidco protest for water news
नाशिक : सिडकोत पाण्यासाठी आंदोलन, महापालिकेचा निषेध
‘एमपीएससी’ प्रश्नपत्रिकेचे आमिष प्रकरणी नागपूरमधून आणखी दोघे अटकेत
On which day will water supply be stopped in Nagpur
नागपुरात कोणत्या दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार? ३० तास …
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा

हेही वाचा… कल्याण – डोंबिवली मध्ये मुसळधार पाऊस

संबंधित वाहन चालकांच्या मोबाईल क्रमांकावर दंडाच्या रकमेचा संदेश पाठविण्यात येतो. अनेक वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्या वाहन चालकाने वारंवार नियमांचे उल्लंघन केले तर त्याची दंडाची रक्कम वाढत जाते. अशा वाहन चालकांविरोधात पोलिसांकडून खटला भरण्यात येतो. वाहनाच्या किमतीपेक्षा दंडाची रक्कम ही जास्त असल्याचे काही प्रकरणात समोर आले आहे. त्यामुळे वाहन चालकांना दंडाची रक्कम कशी भरावी असा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा… मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

ठाणे आयुक्तालयात आतापर्यंत ५२ कोटी रुपयांहून अधिकचा दंड ई-चलानद्वारे आकारला आहे. यातील ४६ कोटी रुपयांहून अधिकचा दंड अद्याप भरण्यात आलेला नाही. त्यामुळे तडजोडीअंती दंडाची रक्कम काही प्रमाणात कमी केली जाणार आहे. त्यासाठी लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे कसूरदार वाहन चालकांनी त्यांच्या परिसरातील वाहतूक शाखेच्या उपविभागात संपर्क साधून लोकअदालती संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी असे आवाहन ठाणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच जिल्हा सेवा विधी प्राधिकरण येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत लोकअदालतीसाठी उपस्थितीत राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Story img Loader