उल्हासनगर महापालिकेने आपल्या पालिकेच्या शाळेच्या एका भुखंडावर दिलेली सनद चुकीच्या पद्धतीने दिल्याचा आरोप करत ही सनद तातडीने रद्द करण्याची मागणी उपविभागीय कार्यालयाकडे पत्राद्वारे केली होती. मात्र पालिकेने अपुऱ्या माहितीच्या आधारे हे पत्र उपविभागीय कार्यालयाला दिल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

हेही वाचा- ठाण्यातील वंदना सिनेमागृहाजवळील उड्डाणपूल उद्यापासून वाहतूकीसाठी बंद

infosys mass lay off marathi news
“Infosys एक भयानक पद्धत रूढ करत आहे”, मोठ्या कर्मचारी कपातीवर NITES ची केंद्र सरकारकडे तक्रार!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maslow s pyramid loksatta
जिम्मा न् विमा : जोखमीची गुंतवणूक कोणती?
revenue minister chandrashekhar bawankule on son law loan catering money Wardha
“जावयाचं कर्ज नको, हे घ्या जेवणाचे पैसे,” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Police officer beats up police inspector in nagpur
पोलीस निरीक्षकाला दिला कर्मचाऱ्याने चोप
Guillain Barre syndrome treatment
‘जीबीएस’च्या उपचारांवरून आमदारांची नाराजी, अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा
municipal corporation issued notices to 5000 establishments with unauthorized constructions in Chikhli Kudalwadi
पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील पाच हजार लघुउद्योजकांना नोटीस; उद्योजकांचा एमआयडीसी बंद करण्याचा इशारा

उल्हासनगर महापालिकेने उपविभागीय कार्यालयाला पत्र देत सिंधु एज्युकेशन सोसायटी या संस्थेस देण्यात आलेली सनद तात्काळ रद्द करण्याची विनंती केली होती. त्यामुळे उल्हासनगर उपविभागीय कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पालिकेने लिहलेल्या पत्रात उपविभागीय कार्यालयाच्या कारभारावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. उपविभागीय कार्यालयाने सनद देताना प्रक्रिया राबविली नसल्याचा आरोप केला होता. या पत्रामुळे आधीच चर्चेत असलेल्या उपविभागीय कार्यालयाच्या कारभारावर पुन्हा संशय घेतला जात होता. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शासकीय भुखंडावर देण्यात आलेल्या सनद प्रकरणात चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले होते. मात्र उल्हासनगर महापालिकेच्या या पत्रानंतर खळबळ उडाली असतानाच उपविभागीय कार्यालयातून करण्यात आलेल्या खुलाशानंतर उल्हासनगर महापालिकेच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

ज्या सनद प्रकरणावरून पालिकेने उपविभागीय कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याच उपविभागीय कार्यालयाच्या खुलाशानंतर आता उल्हासनगर महापालिकेची कोंडी झाली आहे. ज्यावेळी पालिकेला याबाबत विचार करण्यात आली, त्यावेळी पालिकेने काहीही सूचित केले नाही. मात्र त्यानंतर आता वर्षभराने पालिका खडबडून जागी झाल्याने पालिकेच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा- बदलापुरात अवकाळी पावसाची हजेरी; नोकरदारांची तारांबळ

नक्की झाले काय

सिंध एज्युकेशन सोसायटी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बॅरेक क्रमांक १८०५ या मिळकतीची अतिरिक्त जागा देण्याची मागणी केली होती. हा अर्ज सर्वप्रथम कार्यालयाने नामंजूर केला. अर्जदारांनी पुढे उच्च न्यायालयात धाव घेतली. ही याचिका मान्य करून हे प्रकरण पुन्हा उपविभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आले. मात्र संस्थेच्या लगतच्या मोकळया जागेचे सनद प्रदान करण्याचे अधिकार या कार्यालयाकडे नसल्याने अमान्य करून सक्षम प्राधिकरणांकडे दाद मागण्याचे कळवले होते. त्याविरुध्द अर्जदारांनी मुख्य जमाबंदी आयुक्तांकडे फेर तपासणी केली. यावर मुख्य जमाबंदी आयुक्त यांनी १४ ऑक्टोबर २०२१ रोजी आदेश पारित करुन अर्जदार यांचा फेरतपासणी अर्ज मान्य करुन अर्जदारास सनद देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी भूखंडाची मोजणी उल्हासनगर महापालिकेला अभिप्राय देण्याची विनंती केली होती. मात्र त्यावर हा भूखंड त्यांच्या यादीत अथवा सार्वजनिक प्रयोजनासाठी आहे का याबाबत सूचित केले नव्हते. त्यानंतर ही सनद देण्यात आली. त्यामुळे पालिकेने केलेला दावा उपविभागीय कार्यालयाने खोडून काढल्याने पालिकेची कोंडी झाली आहे.

Story img Loader