डोंबिवली जवळील २७ गावामधील भोपर गावात शनिवारी पहाटे प्रसाद पाटील यांच्या घराला आग लागली. गाव गाढ झोपेत असताना ही घटना घडली. पाटील कुटुंबियांना घरात खूप धूर झाला असल्याचे दिसले. त्यांनी उठून पाहिले तर घराला चारही बाजूने आग लागली आहे. तात्काळ त्यांनी आपल्या पत्नी मुलींसह घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे ते थोडक्यात बचावले.

हेही वाचा- मध्य रेल्वेचा खोळंबा ; ठाणे रेल्वे स्थानकात तुफान गर्दी

Increase in entertainment fees business license fees Mumbai print news
करमणूक शुल्क, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ; व्यावसायिक झोपड्यांना कर
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
commercial building, Ghatkopar , fire,
मुंबई : घाटकोपरमधील व्यावसायिक इमारतीला भीषण आग
Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

आगीमध्ये प्रसाद पाटील यांची पत्नी प्रीती, त्यांच्या दोन मुली समीरा आणि समीक्षा गंभीर भाजल्या आहेत. त्यांना तात्काळ गावकऱ्यांनी डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आहे. प्रसाद पाटील हेही गंभीररित्या होरपळले आहेत. आगीची माहिती तात्काळ अग्निशमन जवान, पोलिसांना देण्यात आली. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा- डोंबिवलीजवळील २७ गावांना ९० दशलक्ष पाणी पुरवठा ; मंत्री उदय सामंत यांचे आदेश

जवानांनी एक तासाच्या प्रयत्नात आग विझवली. पहाटेची वेळ आणि हवा नसल्याने आग विझविण्यात अडथळे आले नाही आणि आग पसरली नाही, अशी माहिती अग्निशमन जवानांनी दिली. आग कशामुळे लागली, विद्युत प्रवाहात अडथळा येऊन आग लागली की कोणी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पाणी टंचाई, केबल चालकाची आत्महत्या, रस्ता अडवून कमानीची उभारणी करणे अशा काही कारणांनी भोपर गाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

Story img Loader