कल्याण: टिटवाळा येथील बनेली भागातील तीन अल्पवयीन मुले बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. या तीन मुलांचा कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती कोठेच आढळुन न आल्याने या मुलांच्या पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली आहे. पोलिसांनी विशेष पथके तयार करुन या अपहृत मुलांचा शोध सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी सांगितले, बनेली गावातील तीन वेगळ्या घरांमधील मुले खेळण्यासाठी दुपारी घराबाहेर पडली. संध्याकाळ झाली तरी मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी बनेली, टिटवाळा, मांडा भागात मुलांचा शोध घेतला. मुले कोठेच आढळुन आली नाहीत. मुलांचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करुन मुलांच्या पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. बनेली, मांडा, टिटवाळा भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून मुलांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

पोलिसांनी सांगितले, बनेली गावातील तीन वेगळ्या घरांमधील मुले खेळण्यासाठी दुपारी घराबाहेर पडली. संध्याकाळ झाली तरी मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी बनेली, टिटवाळा, मांडा भागात मुलांचा शोध घेतला. मुले कोठेच आढळुन आली नाहीत. मुलांचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करुन मुलांच्या पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. बनेली, मांडा, टिटवाळा भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून मुलांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.