ठाणे : ठाण्यात काही नागरिकांच्या शिधापत्रिकेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्या तातडीने महिन्याभरात मार्गी लावा. तसेच प्रत्येक क्षेत्रात शिधावाटप विभागाच्या शिबिरांचे आयोजन करा, असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा – ठाणे स्थानकाच्या फलाट सात ते दहावरील मुंबई दिशेकडील पादचारी पुल दोन दिवसांपासून बंद

hm amit shah instructions to distribute seats according to ability to win assembly elections
जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच जागावाटप; अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना बजावले
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
Dates for each police station to record statement of victims in POCSO
पोक्सोंमधील पीडितांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना तारखा
bmc officials busy with ministers meetings ahead of assembly elections
पालिकेचे अधिकारी बैठकीतच व्यस्त; निवडणूकीच्या तोंडावर मंत्र्यांच्या बैठकांचा सपाटा
maharera issue model guidelines to regulate senior citizen housing projects
ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणासाठी विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलत! राज्याकडून मसुदा जाहीर; हरकती-सूचनांसाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदत
Pointing out lack of coordination in development system Nitin Gadkari reprimanded officials
विकास यंत्रणातील असमन्वयाकडे लक्ष वेधत गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
anganwadi workers 500 crores marathi news
अंगणवाड्यांमध्ये ५०० कोटींच्या छत्र्या, मेगाफोन खरेदीचा घाट

हेही वाचा – कल्याण-डोंबिवली महापालिकेची गतिमान ई ऑफिस प्रणाली संथगतीने

आमदार संजय केळकर यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहात शिधापत्रिका संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिधावाटप अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. अनेक भागांत नागरिकांची शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे समोर आले. तर काही ठिकाणी नागरिकांना ठरवून दिलेला शिधा मिळत नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार संजय केळकर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना शिधापत्रिका दुरुस्तीसाठी शहरात शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्या. १९९८ चे निकष बदलण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.