ठाणे : दिवा येथील कचराभूमी बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेने डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून तोपर्यंत पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प प्रशासनाने उभारला आहे. दिड महिन्यांपुर्वीच सुरु झालेला हा प्रकल्प गेल्या सात दिवसांपासून बंद पडला आहे. या प्रकल्पातील यंत्रणेमध्ये साडी, गाद्या, फर्निचरचा कचरा अडकला असून यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचे पाणीही प्रकल्पात शिरले असून त्याचाही फटका या प्रकल्पाला बसला आहे. यामुळे ठाण्याचा कचरा पुन्हा दिवा कचराभुमीवर टाकला जात आहे. दरम्यान, २ ऑक्टोबरपर्यंत भंडार्ली येथील कचरा विल्हेटवाट प्रकल्पातील बंद पडलेली यंत्रणा सुरु होण्याबरोबरच दिवा आणि मुंब्य्रातील कचरा गोळा करण्यासाठी यंत्रणा उभारणीचे काम पुर्ण होणार आहे. त्यानंतर दिवा कचराभुमी कायमस्वरुपी बंद होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा