कल्याण स्थानकावर काही अज्ञात कारणामुळे क्रॉसिंग पॉईंटमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे कर्जत आणि खोपोलीकडे जाणीर रेल्वे वाहतूक मोठ्याप्रमाणात विस्कळीत झाली आहे. लोकलसह पुण्याकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. नेमका बिघाड कशामुळे झाला याचे कारण तपासले जात आहे. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत/खोपोलीकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. त्याचा परिणाम कसारा बाजूच्या वाहतुकीवरही होत आहे. या क्रॉसिंग पॉईंटवरूनच रेल्वे आपला ट्रॅक बदलत असतात. संध्याकाळच्या वेळी हा बिघाड झाल्याने ऑफिसमधून घरी निघालेल्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. रेल्वे स्थानकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.