ठाणे : जर लोकांनी सत्ता दिली नाहीतर, लोकांनी निवडुण दिलेल्या सदस्यांना आमिष दाखवून बाजुला करून सत्ता हातात घ्यायची, हे सुत्र भाजप वापरत असून त्याचबरोबर ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता काबीज करणे हे देशासमोरच गंभीर चित्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. सरकारने आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केलेली नसून त्याचबरोबर बिल्कीस बानो, केंद्रीय यंत्रणांचा वापर यासारख्या विषयांवरुन त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टिका केली. देशात पर्याय द्यायचा असेल तर सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. यापुढे सत्तेची जबाबदारी हाती घेणार नसल्याचे विधान करत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा