भाईंदर : देशभरात सुरु असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेत’ महाराष्ट्र राज्यातून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे सहभाग नोंदवला. यासाठी मीरा रोड येथे मीरा भाईंदर महापालिकेकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना आणि उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. या अंतर्गत ९ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध राज्यांना संबोधित केले. यावेळी मोदी यांनी केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. शिवाय याचा लाभ घेतलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांचा अनुभव जाणून घेतला.

हेही वाचा : उल्हासनगर: महाराष्ट्रात पहिल्यांदाच रूग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वार्ड

pune district transport marathi news
पुणे : जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतुकीसाठी तीस वर्षांचा आराखडा, १.२६ लाख कोटींचा खर्च अपेक्षित
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shri Mangalmurti s maghi Rath Yatra
श्री मंगलमूर्तींच्या माघी रथयात्रेचे चिंचवड येथून मोरगावकडे प्रस्थान
MPSC, MPSC question paper,
मोठी बातमी: ४० लाखात ‘एमपीएससी’ची प्रश्नपत्रिका देण्यावर आयोगाकडून उत्तर, प्रश्नपत्रिका कडेकोट बंदोबस्तात
Washim district, Maharashtra , Operation Dronagiri,
‘ऑपरेशन द्रोणागिरी’ पथदर्शी प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून एकमेव वाशीम जिल्ह्याची निवड; जाणून घ्या वैशिष्ट्ये
Premachi Goshta
Video: आदित्यला मिळवलं मात्र सईला गमावलं? सावनीच्या कारस्थानापुढे मुक्ताचं ममत्व जिंकणार…; पाहा प्रोमो
marathi actor abhijeet shwetchandra and his wife announces pregnancy
“बेबी श्वेतचंद्र Coming…”, लोकप्रिय मराठी अभिनेता होणार बाबा, चाहत्यांना ‘अशी’ सांगितली गुडन्यूज, व्हिडीओने वेधलं लक्ष
Special campaign for the conservation of Kanheri Caves
कान्हेरी लेणीच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम; पर्यटनदृष्ट्या विकसित करणार; खासदार पीयूष गोयल यांची घोषणा

महाराष्ट्र राज्यातून यात केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग घेतला होता. यासाठी मीरा रोड येथील बुद्ध विहार व विपश्यना केंद्रात असलेल्या सभागृहात मोठा एलईडी टीव्ही लावून महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गोयल यांच्यासह महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते चंद्रकांत पाटील, आमदार गीता जैन, आयुक्त संजय काटकर, भाजप जिल्हा अध्यक्ष किशोर शर्मा, माजी महापौर ज्योस्त्ना हसनाळे, विधानसभा प्रमुख रवि व्यास, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता पाटील आणि इतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

‘विकासभारत दुत’ बनण्याचे नागरिकांना आवाहन

देशात नरेंद्र मोदी सरकार मार्फत विविध योजना राबावल्या जात आहेत. याचा मोठा लाभ हा मध्यम वर्ग व गरीब नागरिकांना व्हावा हा हेतू आहे. यासाठीच ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ आयोजन करण्यात आले. त्यामुळे समाजात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी आपल्या समाजातील गरजू लोकांपर्यत केंद्र शासनाचे उपक्रम पोहोचवावे म्हणून स्वतः ‘विकास भारतदुत’ म्हणून जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कार्यक्रमाला उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांना केले.

Story img Loader