मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाला आहे. त्यामुळे कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. बदलापूर आणि वांगणी स्टेशनच्या दरम्यान इंजिन बंद पडल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. कल्याणहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. इंजिन बाजूला सारण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

ऑफिस अवर्स संपल्यानंतर यावेळी लोक घरी परतत असतात. त्यामुळे लोकलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशात लोकल सेवेचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेचं वेळापत्रक बोंबलणार हे आता दिसतंच आहे. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. एबीपी माझाने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Anger among commuters over digging of new concrete road in Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्याचे खोदकाम केल्याने प्रवाशांमध्ये संताप
Another option for repairing the Malabar Hill Reservoir
मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या दुरुस्तीसाठी अन्य पर्याय
Central Railway Time Table, Kasara local, Karjat local,
मुंबई : मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल; रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल लवकर सुटणार
Bhayander Metro, Kashigaon Station,
भाईंदर मेट्रोला विलंब होणार ? काशिगाव स्थानाकाच्या जागेअभावी प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता
Mumbai municipal administration, water accumulate,
मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन
central railway cancelled 10 ac local service
मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी त्रासदायक; वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द

बदलापूर आणि वांगणी या दोन मध्य रेल्वे मार्गावर असलेल्या स्टेशन्सच्या दरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटलेली कर्जत लोकल ही पुढे जाऊ शकलेली नाही. इंजिन कशामुळे बिघडलं हे अद्याप समोर आलेलं नाही. इंजिन बाजूला करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. दररोज मुंबई आणि उपनगरांमधून लाखो प्रवासी या लोकलने प्रवास करुन आपल्या कार्यालयापर्यंत पोहचतात. तसंच संध्याकाळ झाली की याच लोकलने घरीही परतत असतात. सकाळी कार्यालयात पोहचण्याची वेळ आणि संध्याकाळी कार्यालयातून घरी परतण्याची वेळ ही मुंबई लोकलसाठी आणि चाकरमान्यांसाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या वेळेत जर लोकलमध्ये काही बिघाड झाला तर मुंबईकरांचे बरेच हाल होतात, तसाच बिघाड आत्ताही झाला आहे.