ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आपण महायुती म्हणूनच लढविणार आहोत. आपल्याबरोबर आलेल्या ५० पैकी एकाही आमदाराचा विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ देणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला. ठाण्यात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात ठाण्यातून झाली. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी महाविजयाचा संकल्प केला. ‘‘काही वेळा बेरजेचे राजकारण करावे लागते. आपला संकल्प काय आहे, हे महत्त्वाचे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडून काढायला हवेत. लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवायचा आहे. त्यासाठी राज्यातील २१० ते २२० आमदार आतापासून एकत्र आले आहेत. आपल्याबरोबर आलेल्या ५० पैकी एकाही आमदाराचा मी आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ देणार नाही. महायुतीचे २०० पेक्षा अधिक आमदार निवडून आणणार, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. ‘‘मुख्यमंत्री म्हणून येथे मीच बसलो आहे. तुमच्यावर ओरखडाही उमटणार नाही. तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमची चिंता मला आहे’’, अशा शब्दात शिंदे यांनी उपस्थित नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

NCP office bearers in Pune decided to make Ajit Pawar Chief Minister on Tuesday
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प मात्र आमदारांची मेळाव्याकडे पाठ !
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
eknath shinde mathadi workers
माथाडी राजकारणाला शिंदे सेनेची बगल ? मराठा बहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
jayant patil appeal bachchu kadu
Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…
cbi arrests rg kar ex principal and psi
कोलकाता बलात्कार प्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह पोलीस निरीक्षकाला अटक; पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश

केंद्राच्या सहकार्याने राज्याचा विकास

राज्यकर्त्यांनी अहंकार बाजूला ठेवून काम करायचे असते. जनतेचे हित कशात आहे, ते पाहूनच राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यायला हवेत. केंद्र सरकार आज राज्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी देत आहे. सुरुवातीची अडीच वर्ष केंद्र सरकार मदतीसाठी तयार असायचे, मात्र राज्याकडून काही मागितले जात नव्हते. कितीतरी योजनांचे पैसे केंद्राकडे पडून होते. आता मात्र प्रत्येक पैसा वापरात येत आहे. रखडलेले रेल्वे प्रकल्प आपण सुरु केले. यापुढेही केंद्राच्या मदतीने राज्याचा विकास करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई महापालिकेत इतके वर्षे सत्तेत असणारेच आता मोर्चे काढू लागले, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.

‘वर्षां’चे दरवाजे सर्वासाठी खुले ‘वर्षां’वर पूर्वी संचारबंदीसारखी स्थिती असायची. आता ‘वर्षां’चे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. खोके घेणाऱ्यांनी खोक्यांची भाषा करु नये, अशी टीकाही त्यांनी केली.