क्लारा कोरिया , प्रतिनिधी, वनशक्ती
अर्निबध शहरीकरणाने नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते. मुंबईच्या परिघात त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांना गटारांची अवकळा प्राप्त झाली. घनगर्द सावली देऊन हवेतला गारवा कायम ठेवणारी झाडे विकास योजनांच्या नावाखाली तोडण्यात आली. दुसरीकडे झाडे लावण्याच्या अटींवर अनेकदा स्थानिक प्राधिकरणांमध्ये कार्यरत असलेली वृक्ष प्राधिकरण समिती झाडे तोडण्याची परवानगी देते. मात्र तोडण्यात आलेल्या या झाडांचे अशा प्रकारे पुनरेपण होते का हे कुणीही तपासून पाहत नाही. ठाणे महापालिकेनेही रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी १४०० झाडे तोडून ती अन्यत्र लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला. यानिमित्ताने विकास की पर्यावरण रक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने गेली काही वर्षे सातत्याने ठाणे परिसरातील ढासळत्या पर्यावरणाचा प्रश्न मांडणाऱ्या ‘वनशक्ती संस्थेच्या’ प्रतिनिधी क्लारा कोरिया यांच्याशी साधलेला संवाद..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा