ठाणे : ठाण्यातील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांनी गद्दारांच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा आमच्याबरोबर यावे, हिंदुत्वाचा झेंडा आपण पुढे घेऊन जाऊ, असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यातील सभेत केले.

ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे यांच्या डोंबिवली व ठाण्यात सभा झाल्या. दोन्ही सभांमधून उद्धव यांनी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना साद घातली. ‘शिवसेना-भाजपची युती अभेद्या ठेवण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाजन यांच्यामुळे भाजपला ओळख मिळाली. त्याच महाजन यांच्या मुलीला भाजपने उमेदवारी नाकारली. म्हणजे निष्ठावानांना डावलायचे आणि कल्याणमध्ये गद्दाराच्या मुलाला उमेदवारी द्यायची. भाजपची ही वाटचाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का,’ असा सवाल ठाकरे यांनी डोंबिवलीत मुसळधार पावसात झालेल्या प्रचार सभेत केला.

raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Raj Thackeray
Raj Thackeray : “अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार

हेही वाचा >>> लोकसभा मताधिक्यावर पालिकेत उमेदवारी ; विनोद तावडे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय क्षितिजावर ओळख नव्हती, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती. त्याची तुम्ही अशी परतफेड करता का, असा सवाल उद्धव यांनी केला. मोदी हे आम्हाला नकली सेना म्हणतात. पण तुमचा भाजप नकली झाला असून त्यात सगळे आयात भाडोत्री आहेत,’ अशी टीकाही त्यांनी केली. मुंबईत झालेल्या दुर्घटनेपासून काही अंतरावर मोदींनी प्रचार फेरी काढली. इतकी निर्दयता त्यांच्यात आली कुठून’, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.

मुसळधार पावसात सभा

कल्याणमधील मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेसाठी उद्धव ठाकरे डोंबिवलीत भागशाळा मैदान येथे आले होते. सभा सुरू होताच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात भिजत उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. मुसळधार पाऊस ही आपल्या विजयाची नांदी आहे, असे ते म्हणाले.

‘चार जूननंतर मोदीमुक्त भारत’

‘हे मोदींचे नव्हे तर गझनीचे सरकार ४ जूननंतर देशात नसेल. त्यामुळे भाजपमधील उरलेल्या धोंड्यांचे काय उरणार, हा प्रश्न आत्ता भाजपला सतावू लागल्याचा टोला त्यांनी लगावला.

Story img Loader