ठाणे : अनंत चतुर्दशी निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणूकीत रात्री दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी रात्री उशीरा जमाववर लाठीमार केला. काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. आज, बुधवारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. गेल्याकाही दिवसांपासून भिवंडीचे वातावरण दुषित करण्याचे कार्य समाजकंटकांडून सुरू झाले आहे असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ

Senior citizen couple cheated by chartered accountant and developer in Dombivli
डोंबिवलीतील सनदी लेखापाल, विकासकाकडून ज्येष्ठ नागरिक पती-पत्नीची फसवणूक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
testament of Shivajirao Jondhale by creating fake medical certificate of doctor in Dombivli
डोंबिवलीतील डॉक्टरचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून शिवाजीराव जोंधळेंचे मृत्यूपत्र
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Sainath tare joined uddhav Thackeray s shivsena
कल्याण: बलात्काराचा गुन्हा दाखल साईनाथ तारे यांना ठाकरे गटात प्रवेश दिल्याने तीव्र नाराजी
Navi Mumbai Semiconductor project
‘सचिन तेंडुलकर ‘पिच’वरून ‘चीप’वर आले’, एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ

भिवंडी येथून रात्री १२.३० वाजाता एका मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणूक वंजारपट्टी नाका परिसरात आली असता, अचानक दगडफेक झाली. या घटनेनंतर या भागात मोठ्याप्रमाणात गर्दी झाली. घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू झाली. काहीवेळानंतर मोठ्याप्रमाणात जमाव याठिकाणी निर्माण झाला. तसेच काही वाहनांची तोडफोडही झाली. अखेर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. जमावातील काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे. आज ठाणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त शहरात ठेवला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून भिवंडीत काही समाजकंटकांकडून भिवंडीतील सामाजिक वातावरण बिघडविण्याचे कार्य सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.