कल्याण – दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणावर येथील खासगी रुग्णालय प्रशासनाने अतिशय निष्काळजीपणे उपचार केले. या रुग्णाच्या पायाच्या संवेदना गेल्यानंतर त्याला रुग्णालयात निरीक्षणाच्या नावाखाली सात तास उपचार न करता झोपून ठेवले. शेवटच्या क्षणी त्यांना मुंबईत केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले. या सगळ्या प्रक्रियेत तरुण रुग्णाला आपला पाय कायमचा गमवावा लागला. या निष्काळजीपणाबद्दल रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले.

तक्रारीसाठी रुग्ण योगेश राजकुमार पाल यांना आलेल्या खर्चापोटी ३० हजार रुपये रुग्णाला देण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी, सदस्या पूनम महर्षी यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात कल्याणमधील खासगी रुग्णालय, ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

Prakash Abitkar
खासगी रुग्णालयांना दिलासा देणारं आरोग्यमंत्र्यांनी उचललं पाऊल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Changes in the recipes of meals served under the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Amravati news
अमरावती : ‘गोडखिचडी’, ‘अंडापुलाव’साठी गुरूजींना मागावी लागणार माधुकरी!
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
pimpri chinchwad municipal corporation news
पिंपरी : शहराची लोकसंख्या ३० लाख आणि पहिल्या लोकशाही दिनात केवळ दोन तक्रारी
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Prakash Abitkar marathi news
आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान दोन वेळा अचानक भेटी द्या, आरोग्य मंत्र्यांच्या आरोग्य विभागातील वरिष्ठांना सूचना

हेही वाचा – कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरणारा चोरटा अटक

ऑक्टोबर २०१० मध्ये तक्रारदार योगेश पाल दुचाकीवरून चालले होते. त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला दुखापत असल्याने तेथे प्लास्टर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले. दोन दिवसांनी योगेश यांना आपल्या दुखापत झालेल्या उजव्या पायाची हालचाल होत नसल्याचे, त्याला संवेदना नसल्याचे आढळले. कुटुंबीयांना योगेशला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पायाचे प्लास्टर अतिशय घट्ट केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आले. दुखापतीच्या ठिकाणी गुंतागुंत झाल्याचे उपचारी डाॅक्टरांना दिसले. कल्याणमधील रुग्णालयातील डाॅक्टरांनी योगशेला केईएम रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तेथील डाॅक्टरांनी अतिशय घट्ट पद्धतीने प्लास्टर केल्याने पायाची दुखापत अतिशय गंभीर झाल्याचे दिसले. पाय काढण्याचा निर्णय केईएम रुग्णालयात घेण्यात आला.

हेही वाचा – ठाणे-पालघर : विकासाचा वेग आणि ताण

कल्याणमधील खासगी रुग्णालयाच्या निष्काळजीपणाने योगेशला पाय गमवावा लागला. त्याला बारावीची परीक्षा देता आली नाही. त्याला मानसिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. कृत्रिम पायासाठी साडेतीन लाख रुपये खर्च करून योगेशने आपला दिनक्रम सुरू ठेवला आहे. खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपणास पाय गमवावा लागला. संबंधित खासगी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध योगेशने ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली. बारा वर्षे हा दावा मंचासमोर सुरू होता. खासगी रुग्णालयात सुसज्ज सुविधा असताना तेथील डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष मंचाने काढला. रुग्णालय प्रशासनाला रुग्ण योगेशला भरपाई देण्याचे आदेश दिले.

Story img Loader