ठाणे : सामान्य माणूस दागिने गहाण ठेवतो, कर्ज काढतो आणि आपल्या घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पैसे गुंतवितो. पण, काही विकासक अशा लोकांची फसवणुक करून त्यांचे घराचे स्वप्न भंग करताच. पण, शिवाय त्यांनी पैसे परत मागितले तर त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करतात. परंतु ही बाब आम्ही सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सोमवारी ठाण्यातील ‘जनसेवकाचा जनसंवाद’ उपक्रमादरम्यान दिला.

ठाणे येथील खोपट परिसरात भाजपचे कार्यालय आहे. या कार्यालयात भाजपचे आमदार संजय केळकर हे दर शुक्रवारी ‘जनसेवकाचा जनसंवाद’ हा उपक्रम राबवितात. या उपक्रमास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी झालेल्या उपक्रमांत एकूण ६२ तक्रारींची निवदेन नागरिकांनी सादर केली. यामध्ये महापालिका, महानगर गॅस, फेरीवाले, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, फसवणूक अशा विविध विषयांसंदर्भातील निवेदनांचा समावेश होता.

यावेळी ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे, दीपक जाधव, सुरेश कांबळे, ओंकार चव्हाण, राजेश गाडे, संतोष साळुंखे उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त भाजपा मंडळ अध्यक्षांनी आमदार केळकर यांची भेट घेतली.याच जनसंवाद उपक्रमात विकासकांनी फसवणूक झालेल्या नागरिकांनी आमदार केळकर यांची भेट घेतली.

यामध्ये पनवेल, मुलुंड, घाटकोपर, दादर, साकीनाका, चेंबूर, बोरिवली या भागातील नागरिकांचा समावेश होता. ‘सबसे सस्ता…सबसे अच्छा’ या स्लोगन वर सी लिंक प्रॉपर्टी ने फसवणूक केल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. सी लिंक प्रॉपर्टी ने या नागरिकांशी खोटे करार केले आहेत. लोकांचे चेक बाऊन्स झाले आहेत, अशा तक्रारी नागरिकांनी केली. या संदर्भात या फसवणूकदारांनी आमदार केळकर यांना निवदेन देऊन घरासाठी गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी विनंती केली.

पोलिस आयुक्तांना भेटणार

गरीब सामान्य माणूस एक – एक पैसा जोडतो, कर्ज काढतो, दागिने गहाण ठेवतो आणि आपल्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता पैसे गुंतवतो. पण असे विकासक या सामान्य लोकांची फसवणूक करून त्यांचे घराचे स्वप्न तर भंग करतात. शिवाय त्यांनी पैसे परत मागितले तर त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करतात. ही बाब खूप गंभीर आणि चीड येणारी आहे. ही बाब आम्ही सहन करणार नाही असा इशारा आमदार केळकर यांनी दिला. या प्रकरणी तातडीने पोलीस आयुक्तासोबत चर्चा करून अशा फसवणूक करणाऱ्या विकासकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. फसवणूक झालेल्यामध्ये कोणी रस्त्यावर गजरे विनणारे, कोणी रस्त्यावर झाडू मारणारे, कोणी वॉचमेन, कोणी फेरीवाले असे गरीब कष्टकरी नागरिक असून त्यांचे पैसे परत मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.