लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेने पालिका मुख्यालय, डोंबिवलीतील विभागीय मुख्यालयात आयुक्त, उपायुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणारे लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
passenger ramp at platform five of Dombivli railway station will be closed
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट पाचवरील प्रवासी उतार मार्गिका सोमवारपासून बंद
Banners Worli BDD chawl, Worli BDD chawl Residents,
Worli BDD Chawl Residents : मत मागण्यासाठी आमच्या चाळीत पाय ठेवू नये… वरळी बीडीडी चाळीत झळकले फलक, रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार
maratha reservation balaji kalyankar viral video
“तुम्ही स्वत:साठी पक्ष बदलता, पण…”, शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल; जरांगे पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…
Loksatta editorial Six Canadian diplomats ordered to leave India
अग्रलेख: ‘कॅनडा’ऊ कटकटाऊ…
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय

सामान्य नागरिकांच्या तक्रारी, नागरी समस्या, अडचणी यांचा तात्काळ निपटारा व्हावा म्हणून शासन आदेशावरून कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात, विभागीय उपायुक्त कार्यालयात अनेक वर्षापासून नागरिकांच्या सोयीसाठी लोकशाही दिन कार्यक्रम आयोजित केले जातात. मंगळवारी आयुक्तांच्या दालनात लोकशाही दिन आयोजित केला जात होता. पालिका हद्दीतील सुमारे १५० हून अधिक तक्रारदार नागरिक या लोकशाही दिन कार्यक्रमाला उपस्थित राहत होते.

आणखी वाचा-मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी डोंबिवलीत

आयुक्त, उपायुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत साहाय्यक आयुक्त, अभियंते यांच्या समोर संबंधित प्रभागातील नागरिकाच्या तक्रारीचा निपटारा केला जात होता. पालिकेत अनेक महिने आणि वेळा हेलपाटे मारुनही आपल्या तक्रारीचे निराकरण होत नसल्याने तक्रारदार नागरिक त्रस्त होते. परंतु, लोकशाही दिन कार्यक्रमात आयुक्तांच्या समोर तक्रारीचे निराकरण झाल्याने तक्रारदार नागरिक समाधान व्यक्त करतात.

आचारसंहितेमुळे रद्द झालेले लोकशाही दिन कार्यक्रम विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे २६ नोव्हेंबर नंतर पुन्हा सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.