ठाणे : ठाणे, कोपरी, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्याने महापालिकेच्या कारभारावर टिका होत असतानाच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. महापालिकेत प्रशासक नेमण्यात आल्यानंतर अनागोंदी कारभार वाढीस लागला असून त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांसाठी प्रती चौरस फुटाप्रमाणे पैसे घेण्याचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केल्याने पालिकेचा अतिक्रमण विभाग चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील असून त्याचाच जिल्ह्यातील ठाणे महापालिकेवर आमदार केळकर यांनी टिका केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मुंबईचे दुखणे वेगळे आहे आणि ठाण्याचे दुखण असे आहे की, आम्हाला सांगताही येत नाही आणि बोलता येत नाही. अशा प्रकारची आमची परिस्थिती झाली आहे. प्रत्यक्ष दाखवून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई बांधकामावर केली जात नाही आणि अधिकाऱ्यावरही कारवाई होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा