ठाणे : जिल्ह्यात पाऊस, खड्डे आणि अवजड वाहतूक यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अवजड वाहतूकीला दिवसा बंदी घालण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयानंतर शहरातून दिवसा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या संख्येत मोठी घट झाली असली तरी काही भागातून आजही अवजड वाहनांची दिवसा घुसखोरी सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गुजरात, नाशिक आणि जेएनपीटी बंदरातून ठाणे आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. मुंब्रा बाह्यवळण मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गे ही वाहतूक सुरू असते. रात्री १० ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते सायंकाळी ४ यावेळेत ही वाहतूक सुरु असते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे महामार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच दुपारच्या वेळेत सुरू असलेल्या अवजड वाहतूकीमुळे कोंडीत भर पडत आहे. या कोंडीत नागरिकांसह शाळेच्या बसगाड्या अडकून पडत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेऊन दिवसा अवजड वाहतूकीला बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबई-नाशिक महामार्गाची पाहाणी करून मास्टीक पद्धतीने खड्डे भरण्याचे आदेश दिले होते. यानंतर खड्डे भरणीच्या कामासाठी ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी अवजड वाहतूकीला दिवसा बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार नवी मुंबई येथून मुंब्रा बाह्यवळण मार्गे होणाऱ्या अवजड वाहतूकीला शिळफाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. मुंबई आणि नवी मुंबई मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या अवजड वाहतूकीला आनंदनगर टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. नाशिककडून येणाऱ्या अवजड वाहनांना शहापूर तर, गुजरातकडून येणाऱ्या अवजड वाहनांना मनोर येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Negative reactions of Nagpurkars on the new experiment of traffic No Right Turn
‘नो राईट टर्न’: वाहतुकीच्या नव्या प्रयोगावर नागपुरकरांची प्रतिक्रिया, हा तर ‘नाकापेक्षा मोती जड’!
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Residents of Nagpur are upset because of the no right turn activity
नागपूर: ‘नो राईट टर्न’मुळे नागपूरकर हैराण
Action will be taken against drunken drivers by nakabandi in Pune city
शहरात आता रोज रात्री नाकाबंदी; मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
new water purification project, water purification Bhandup Complex, Mumbai,
मुंबई : भांडूप संकुलातील नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामला सुरुवात, जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपुष्टात
Traffic congestion on Eastern Expressway resolved with flyovers opening at Chhedanagar Junction
छेडानगर जंक्शन अखेर वाहतूक कोंडीमुक्त
third bridge over Vashi Khadi, bridge Vashi Khadi open,
नवी मुंबई : वाशी खडीवरील तिसऱ्या पुलावरून आजपासू वाहतूक सुरू, टोलमुक्तीमुळे सततची वाहतूक कोंडी फुटली
Traffic congestion due to vehicles coming from flyovers congregating in one area in nagpur
नागपूर: उड्डाण पुलांचा घोळात घोळ, सोयींऐवजी वाहतूक कोंडीची भर

अवजड वाहतूकीला ठाण्यात दिवसा म्हणजेच पहाटे ५ ते रात्री ११ यावेळेत बंदी घालण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत मात्र अवजड वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. ३० ऑगस्टपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. या निर्णयामुळे शहरातून दिवसा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या संख्येत मोठी घट झाल्याने कोंडी कमी झाल्याची चित्र दिसून येत आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरून काही अवजड वाहनचालक दिवसा घुसखोरी करून शहरात वाहतूक करताना दिसत आहे. रस्ते कोंडीमुक्त असल्याने हे चालक वेगाने वाहन चालवित असून यामुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. घोडबंदर, ठाणे, मुंबई-नाशिक, कशेळी-काल्हेर या मार्गांवर हे चित्र दिसून येते. पालघर, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून ही वाहने रोखून धरण्याऐवजी शहरात सोडली जात आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर ही वाहने रोखून धरल्यास आणखी कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या वाहनांना रोखून धरण्याऐवजी वाहतूक करून दिली जाते, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.