इतिहासप्रेमींकडून किल्ल्यावर साफसफाई
वसईचा किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडातून मोकळा करण्यासाठी चिमाजी अप्पांनी बांधलेला उत्तनजवळील धारावीचा किल्ला आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे. इतस्तत: पडलेला कचरा, वाढलेले रान, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, अतिक्रमणे यात हा किल्ला गुदमरून गेला होता. गड-किल्ले अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहासप्रेमी मंडळींनी नुकतीच या किल्ल्यात साफसफाई मोहीम राबवली.
चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर मिळवलेल्या विजयात धारावी किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वसई किल्ल्याच्या अगदी समोर उत्तन येथील चौक परिसरात जंजिरे धारावी किल्ला आहे. चौक जेटीकडून वर गावाकडे जाताना हा किल्ला लागतो. सध्या झुडपांच्या गर्द रानात तो सहजासहजी नजरेत येत नाही. पोर्तुगीजांची समुद्रमार्गाने होणारी रसद तोडण्यासाठी चिमाजी अप्पांनी या किल्ल्याची बांधणी केली. हा टापू जिंकण्यासाठी चिमाजी अप्पांनी आठ वेळा प्रयत्न केला, नवव्या वेळी मात्र त्यांना यश मिळाले. ‘‘एका धारावीमुळे काय हालाहाल झाली, हे ईश्वरास ठाऊक’’ असे चिमाजी अप्पांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, त्यावरून हा किल्ला किती महत्त्वाचा होता याची सहज कल्पना येते, अशी माहिती किल्ल्यांचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी दिली. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधल्याचे सांगितले जाते, परंतु हे सर्वस्वी चुकीचे असून किल्ल्याच्या बांधणीवरून तो मराठय़ांनीच बांधल्याचे सहज दिसून येते, असे राऊत म्हणाले.

राज्य सरकारचे दुर्लक्ष
राज्य शासनाचा पुरातत्त्व विभाग याला किल्ला मानायलाच तयार नाही. त्यामुळे संरक्षित ऐतिहासिक वास्तूंमध्ये हा किल्ला येत नाही. याच कारणास्तव या किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर झाडेझुडपे उगवली आहेत, बुरुजांचा वापर मौजमजा व मद्यपानासाठी केला जातो हे या ठिकाणी सापडलेल्या मद्याच्या बाटल्यांवरून स्पष्ट होते. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. संजय वर्तक व डॉ. स्वप्ना माळी यांच्या नेतृत्वाखाली पालघर येथील सह्य़ाद्री मित्र मंडळ, विरार येथील स्वराज्य व मुंबईतील मालाडच्या श्री शिव संकल्प या दुर्गप्रेमी संस्थांच्या सदस्यांनी तब्बल आठ तास श्रमदान करून किल्ल्यातल्या दर्या-बुरुजाची साफसफाई केली. या ठिकाणी उत्खनन केल्यास इतिहासकालीन भांडी, नाणी तसेच इतर वस्तू हमखास सापडतील आणि इतिहासावर नवा प्रकाश पडेल, असा विश्वास श्रीदत्त राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Those who cannot go to Prayagraj will get experience of holy Kumbh Mela in Nagpur
प्रयागराजला जाणे शक्य नाही; ‘येथे’ मिळणार पवित्र कुंभस्नानाची अनुभूती…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Ashes from a crematorium are falling into Virar swimming pool waters
स्मशानभूमीतील राख पालिकेच्या जलतरणतलावात, विरारच्या फुलपाडा येथील प्रकार
Fish drought like conditions Dapoli coast strong wind speed fish trade
दापोली किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती, जोरदार वाऱ्याच्या वेगामुळे मच्छीची करोडो रुपयांची उलाढाल थांबली
cleaning campaign of Nag Tsoli and Pohra rivers in city will start from February 7
नागपुरातील तीन नद्यांची सफाई एकाच वेळी , सात पोकलेन आणि बरेच काही …
Have you seen the most beautiful hill in Pune, located 5 km from Swargate
स्वारगेटपासून ५ किमी अंतरावर असलेली पुण्यातील सर्वात सुंदर टेकडी तुम्ही पाहिली आहे का? Video Viral
Dharavi Kumbharwada rehabilitation
धारावी कुंभारवाड्याचे मुलुंड कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन?; जागा दाखविण्यासाठी नेल्याने रहिवासी संतप्त
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच

धारावी किल्ल्याची मजबूत तटबंदी आजही शाबूत आहे. दर्या बुरूज, थोडी तटबंदी व बालेकिल्ला बुरूज एवढेच सध्या या किल्ल्याचे अस्तित्व शिल्लक राहिले असले, तरी एकेकाळी सुमारे तीस ते चाळीस एकरावर हा किल्ला वसला होता. या संपूर्ण जागेची साफसफाई केली तर हे स्पष्ट होईल. किल्ल्याच्या परिसराची बारकाईने पाहणी केली तर सैनिकांच्या राहायची ठिकाणेदेखील या ठिकाणी होती व ती दुमजली असावीत, असे दिसून येते.
– श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक.

Story img Loader