डोंबिवली : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गोंधळसदृश्य परिस्थितीवर डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या चालकांनी ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून आपल्या शालेय बसवर फलक लावले आहेत. हे फलक डोंबिवली शहर परिसरात चर्चेचे विषय ठरले आहेत. डोंबिवलीतील खड्डे, रस्ते, अराजक परिस्थितीवर विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित नेहमी शाळेच्या बसवर फलक लावून त्यामधून आपल्या भावना व्यक्त करतात. हा फलकाचा विषय शहर परिसरात चर्चेचा विषय होतो. गेल्या वर्षी शहरातील खड्ड्यांचे विदारक चित्र, प्रशासकीय ढिसाळपणा यावर फलकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले होते.

नऊ ऑगस्ट बुधवारी क्रांतिदिन असल्याने विद्यानिकेतन शाळेच्या बसच्या पाठीमागील भागात राज्यातील अराजकसदृश्य राजकीय परिस्थिती आणि जनता कशी बेघर, बेहाल झाली आहे याचे मार्मिक भाष्य केले आहे. अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या विवेक पंडित यांनी फलकांच्या माध्यमातून संदेश दिले तरी त्यावर भाष्य कोणाची हिम्मत होत नाही. सर्व राजकीय मंडळी त्यांच्याकडे आदराने पाहतात. त्यामुळे फलकाच्या माध्यमातून योग्य संदेश जात असल्याने यावेळी क्रांतिदिनाचे औचित्य साधून पंडित यांनी राजकीय विषयावर भाष्य करणारे फलक शालेय बसच्या मागे लावले आहेत.

loksatta analysis pune witnesses alarming rise In crime rate
पुणे गुन्हेगारीत नाही उणे! राज्याची सांस्कृतिक राजधानी असंस्कृत, असुरक्षित का बनतेय?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Jayant Patil on Ladki Bahin Yojana
सत्तेत आल्यास आघाडी सरकार ‘लाडकी बहीण योजना’ चालू ठेवणार; नेत्यांच्या टीकेनंतर जयंत पाटलांकडून निर्वाळा
karnataka high court
“मशिदीत ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत”; कर्नाटक उच्च न्यायालयाची टिप्पणी!
navneet rana received threat letter
धक्कादायक! भाजपा नेत्या नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचाराची धमकी; हैदराबादवरून आलं निनावी पत्र
High Court relief to law student sentenced to year community service for misconduct
अमर्याद काळासाठी विद्यार्थ्याची हकालपट्टी म्हणजे त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीचा मृत्यूच
Raj Thackeray And Ratan Tata News
Ratan Tata : राज ठाकरेंच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या नाशिकच्या प्रोजेक्टची रतन टाटांना पडली होती भुरळ, म्हणाले होते…
Locals rage against minority students from Kerala in Trimbak
त्रिंबकमध्ये केरळच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांविरुद्ध स्थानिकांचा रोष

हेही वाचा >>> जंगलव्याप्त गावातील विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या; म्हणतात, “बसेस वेळेवर पाठवा”

बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी, उतरण्यासाठी थांब्यावर थांबली की पादचाऱ्यांची तो फलक वाचण्यासाठी गर्दी जमत आहे. डोंबिवलीत विद्यानिकेतन शाळेच्या बसना ट्विटर बस, संदेश बस म्हणून ओळखले जाते. ‘राज्यात शासनकर्ता कोण, प्रशासक कोण हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भ्रष्टाचारासाठी सर्व राजकीय मंडळी आपल्या निष्ठ, सूचिता सोडून कट करुन एक झाली आहेत. पक्षांमध्ये एकसंधता नाही. सर्वत्र भेदाभेदीचे वातावरण आहे. या सगळ्या गोंधळात महागाईने भरडलेला, पिचलेला सामान्य नागरिक मात्र बेघर, बेहाल झाला आहे. कृष्ण अस्तित्वात नसताना आज राज्यात महाभारत घडत आहे. राजा कोणीही असेल, पण रंक म्हणून शेवटी प्रजेकडे पाहिले जाते,’ असे या फलकावरील संदेशात म्हटले आहे.