शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, पाणीउपसा, प्रदूषणामुळे निर्माण होणारे आरोग्याच्या प्रश्नावर डोंबिवली परिसरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उपाय शोधले आहेत. विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या प्रकल्पांची माहिती देताना येणारा काळ हा ‘सावध ऐका पुढल्या हाका’ या ओळींची आठवण करून दिली.

कल्याण डोंबिवली पालिका समूह साधन केंद्र क्र. सात मध्ये आंतरशालेय दोन दिवसांचे विज्ञान प्रदर्शन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय शाखेत आयोजित केले होते. या प्रदर्शनात कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील प्राथमिकच्या सुमारे १०० शाळांनी सहभाग घेतला.

11th admission Second preference
अकरावी प्रवेशात नामांकित महाविद्यालयांना ‘दुसरी पसंती’? होतेय काय?
11th admission, list, students,
अमरावती : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; ४ हजार ९७८ विद्यार्थ्‍यांचा गुणवत्‍ता यादीत समावेश
IIT Mumbai, ramayan, satirical play,
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थांनी केले रामायणावर विडंबनात्मक नाटक, प्रशासनाने विद्यार्थ्यांना ठोठावला १.२ लाख रुपये दंड
Loksatta lokrang A graph of the progress of Marathi Bhavsangeet
मराठी भावसंगीताच्या वाटचालीचा आलेख
Mumbai University , Mumbai University going to Release First Merit List for Degree, Admissions, 13 June 2024, Mumbai University degree admission 2024, Mumbai University degree admission first merit list,
मुंबई : पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार, २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांकडून प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी
Kolhapur, Dr SunilKumar Lavat, Dr SunilKumar Lavate's Amrit Mahotsav Announced, Year Long Celebrations Dr SunilKumar Lavate Amrit Mahotsav,
डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर उपक्रमांचे आयोजन
The number of students giving the NEET exam in Marathi decreased
विद्यार्थ्यांचेच मराठीकडे ‘नीट’ दुर्लक्ष; मराठीतील वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबत साशंकता
Need for regulation to prevent misuse of artificial intelligence says Vivek Sawant
कृत्रिम बुध्दिमत्तेचा दुरुपयोग टाळण्यासाठी नियमनाची गरज, शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत विवेक सावंत

टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती, वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय, टोल नाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी डिजिटल सुविधा, सौर ऊर्जेतून विजेची निर्मिती करून कोळशापासून तयार होणाऱ्या विजेवर कशी मात करता येईल, कचऱ्यापासून खत, वीजनिर्मिती, पाणी व्यवस्थापन अशा समाजोपयोगी पायाभूत प्रकल्पांची मांडणी विद्यार्थ्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून केली. स्वामी विवेकानंद अरुणोदय शाळेच्या विद्यार्थ्यांनी टोल नाक्यावरील होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी वाहनांना दूरसंवेदक बसविला तर टोल नाक्यावर वाहन येताच वाहन आणि नाक्यावरील दूरसंवेदक सक्रिय होऊन काही सेकंदांत वाहन चालकाच्या बँक खात्यामधून टोलवसुली कंपनीच्या खात्यात पैसे जमा होतील. वाहन तात्काळ पुढे निघून जाईल. अशा प्रकारे चार ते पाच रांगांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली तर टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी राहणार नाही, असे सांगितले.

पारंपरिक ऊर्जा स्रोत सौर ऊर्जा, पवनचक्की यांचा प्रभावीपणे वापर केला तर कोळशापासून तयार होणाऱ्या विजेवर अवलंबून राहावे लागणार नाही.

कचऱ्यापासून खत, वीजनिर्मिती करून शहर स्वच्छ व प्रदूषणमुक्त करता येईल. घरातील टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्माण केल्या तर कचऱ्याचे प्रमाण कित्येक पटीने कमी होईल. पालिकेकडून येणारे पाणी आणि कूपनलिका यांच्या पाण्याचा मेळ साधून सोसायटीत पाण्याचा समतोल वापर केला तर घराघरांत होणाऱ्या पाणी उपशावर सोसायटय़ांना निर्बंध आणता आणणे शक्य होईल, असे विद्यार्थ्यांनी सूचविले. या वेळी मुख्याध्यापिका वासंती चौधरी, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य आनंद रानडे, शाळा समिती अध्यक्ष सुभाष वाघमारे, अलका वाकडे, विस्तार अधिकारी सरकटे, केंद्रप्रमुख यादव, नगरसेवक नंदू म्हात्रे, परीक्षक मधुरा सावंत, अमिता बांदेकर आदी उपस्थित होते. रोहित माळी, हर्ष खोचरे यांच्या ‘ई ट्राफिक’ प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला.