मुंबईजवळच्या डोंबिवलीत २३ मे च्या दिवशी अमुदान कंपनीत केमिकल स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कंपनीचे मालक मलय मेहता आणि त्यांच्या पत्नी स्नेहा मेहता यांना अटक करण्यात आली. या दोघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कल्याण न्यायालयात न्यायाधीश एस. एस. राऊळ यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. त्यानंतर आरोपींचे वकील सम्राट ठक्कर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नेमकं काय घडलं?

२३ मे रोजी दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी अमुदान या कंपनीत केमिकलचा स्फोट होऊन १२ जण ठार झाले तर, अनेकांना यामध्ये दुखापत झाली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात ३०४ ए कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. ज्याचा तपास गुन्हे शाखा ठाणे करत असताना ठाण्यातून कंपनीचा मालक मलय मेहता यांना अटक करण्यात आली तर त्यांच्या आई मालती मेहता यांना नाशिक मधून ताब्यात घेण्यात आले. मात्र मालती मेहता कंपनीचे मालक नसून फक्त शेअर होल्डर असल्याने त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले.

PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”

आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

मलय मेहता यांना अटक करत कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळेला २९ मे पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यांना ठोठावण्यात आली होती. आज मलय मेहता यांची पोलीस कोठडी संपली असून त्यांना पुन्हा कल्याण न्यायालयात आणण्यात आले. यावेळी त्यांच्या जे या कंपनीचे पार्टनर आणि डायरेक्टर असल्याने पत्नी स्नेहा मेहता यांनाही अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. यावेळी कल्याण न्यायालयाच्या सर न्यायाधीश श्रीमती एस एस राऊळ यांच्या दालनात आरोपीचे वकील सम्राट ठक्कर आणि सरकारी वकील पी. सकपाळ यांच्यात युक्तिवाद झाला. यावेळी सरकारी वकीला तर्फे तपास पूर्ण करणे, मृतदेहांची ओळख पटवणे, रिअॅक्टर नेमका कुठून आणला आहे याची माहिती मिळवणे या अशा अनेक बाबींसाठी आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. तर सम्राट ठक्कर यांनी राजस्थान न्यायालयाने औद्योगिक विभागात जर असा अपघात घडला तर त्याला ३०४ ए कलम लागू होत नसल्याचा दावा करत कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारण्याचा किंवा त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता असं म्हटलं आहे.

हे पण वाचा- डोंबिवलीत कंपनी स्फोटाने नुकसान झालेल्या ९४१ मालमत्तांचे पंचनामे

डोंबिवलीतल्या स्फोटाची घटना ही नैसर्गिक घटना असून तांत्रिक चुकीमुळे नाही तर उष्णता वाढल्याने हा अपघात झाल्याचे सांगत पोलीस कोठडी सात दिवसांची देऊ नये असा युक्तिवाद केला. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एस एस राऊळ यांनी मलय मेहता आणि स्नेहा मेहता याना ३१ मे पर्यंत म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सम्राट ठक्कर काय म्हणाले?

“माझ्या अशीलांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट आहे त्यामुळे मी फार तपशील देऊ शकणार नाही. ज्या दिवशी स्फोट झाला त्यादिवशी उष्णतेची लाट जास्त होती. अशामुळे स्फोट होतो. ही नैसर्गिक घटना आहे. ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्याविषयी माझी सहानुभूती आहे.” असं ठक्कर यांनी म्हटलं आहे.

Story img Loader