ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोणत्याही सुरक्षा साहित्याविनाच कामगार नाले आणि पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारांसोबतच मलवाहिन्यांची सफाई करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत श्रमिक जनता संघ आणि म्युज फाऊंडेशनने महापालिका आयुक्त तसेच जिल्हा प्रशासनाकडे छायाचित्रांच्या पुराव्यानिशी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची भिती असते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करते. दरवर्षी एप्रिल महिन्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यंदा महिनाभर उशिराने शहरात नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. यामुळे पालिकेच्या कारभारावर सर्वत्र टीका होत असून पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मे महिनाअखेरपर्यंत नालेसफाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. असे असतानाच आता ठाणे महापालिका क्षेत्रात कोणत्याही सुरक्षा साहित्याविनाच कामगार नाले आणि पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारांसोबतच मलवाहिन्यांची सफाई करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

Ganesh Mandals, Satara, Lawsuits Satara,
सातारा : ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या २९ गणेश मंडळांवर खटले
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
3 people suffered with severe eye damage due to lasers light in kolhapur
कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग
satara police arrested couple for malpractice in majhi ladki bahin yojana
लाडकी बहीण’चा गैरफायदा घेणाऱ्या दाम्पत्यास अटक
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
Extortion from businessmen, retired officers, Food and Drug Administration
अन्न व औषध प्रशासन खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत भीती दाखवून व्यावसायिकांकडून वसुली
is offices safe for woman to work
तुमचं कार्यालयीन ठिकाण सुरक्षित आहे का?
Navi Mumbai, helpers municipal schools Navi Mumbai,
नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये मदतनीसांची कमतरता; सखी सावित्री समितीचा अहवाल देण्याचे निर्देश

हेही वाचा – डोंबिवली, कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर मालवाहू डम्पर चालक भरधाव वेगात

शहरातील नालेसफाई कामांच्या पार्श्वभूमीवर श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी महापालिकेकडे लेखी निवदेन दिले होते. त्यामध्ये किमान वर्षभरासाठी प्रत्येक कामगाराचा वैद्यकीय विमा काढावा तसेच कामगारांना सुरक्षा साहित्य पुरवावे अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची बाब खैरालिया यांनीच उघडकीस आणली आहे. ४ मे रोजी ठाणे पूर्व भागात भुयारी गटारामध्ये कामगारांना उतरवून सफाई करण्यात येत आहे. तसेच ठाणे महापालिका मुख्यालयसमोरील गटारातही कामगारांना उतरवून गाळ बाहेर काढण्यात येत आहे. या सर्व कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साहित्ये दिलेली नव्हती.

हेही वाचा – बनावट पर्यटन कंपनीकडून डोंबिवली, कल्याणमधील महिलांची फसवणूक

कामगारांना केवळ रबरी हात मोजे देण्यात आले होते. सुरक्षा गणवेश देण्यात आलेला नव्हता. शिवाय, बंदिस्त गटारामध्ये विषारी वायू असेल किंवा प्राणवायूचे प्रमाण कमी असेल तर कामगारांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून त्यांना प्राणवायूचे मास्क देणे गरजेचे होते. तेही देण्यात आलेले नव्हते, असा दावा खैरालिया यांनी केला आहे. याबाबत श्रमिक जनता संघ आणि म्युज फाऊंडेशनने महापालिका आयुक्त तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली असून त्यासोबत दोन्ही ठिकाणचे छायाचित्र पुरावे म्हणून सादर केले आहेत. याप्रकरणी कंत्राटदार व संबंधित पालिका अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.