ठाणे : संजय राऊत यांनी आनंद दिघेंची मुलाखत ‘लोकप्रभा’ मध्ये छापली होती आणि त्यामुळेच दिघे यांना टाडा लागला होता, असा आरोप शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी केला आहे. राऊत आणि मातोश्रीने दिघेंचा नेहमीच दुस्वास केला, असा आरोपही त्यांनी केला.

धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागातील कथा चुकीची होती. काही व्यक्तिमत्वांना मोठे करण्यासाठी चित्रपट काढण्यात आला होता, म्हणून उद्धव ठाकरे आणि आम्ही उठून निघून गेलो होतो. त्याच प्रमाणे धर्मवीर २ मध्ये देखील अशाच प्रकारे चुकीचा असणार असून त्याची कथा देखील चुकीची असणार असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याला शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.

Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Raut claims to contest Mumbai Municipal Corporation elections on his own Mumbai news
मुंबई महापालिका स्वबळावर, अन्य ठिकाणी मविआ; संजय राऊत यांचा दावा
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Praniti Shinde Criticized Devendra Fadnavis
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा आरोप, “देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम, महाराष्ट्र दिवाळखोरीच्या…”

हेही वाचा… “धर्मवीर दोन”मधून २०२४ची पायाभरणी? पहिल्यातून बंडाचे निशाण, दुसऱ्यातून नेतृत्वावर शिक्कामोर्तब?

हेही वाचा… आता ‘धर्मवीर २’ चित्रपटातील दृश्य कापावे लागणार नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्टीकरण

धर्मवीरच्या पहिल्या भागात काही बंधने होती. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांना राऊत आणि मंडळी कसा त्रास देत होती, कसे खच्चीकरण करायचे हे दाखवले नव्हते. दिघे यांच्यासोबत नेमके काय झाले होते हे दुसऱ्या भागात आपल्याला कळेलच, असे म्हस्के यांनी सांगितले. दिघे यांचे निधन झाल्यानंतर पहिला प्रश्न विचारला गेला, तो म्हणजे, त्यांची संपत्ती कुठे कुठे आहे, त्या सर्व गोष्टी लोकांसमोर येतील. संजय राऊत आणि मातोश्रीने दिघे यांचा जो दुस्वास केला, तो पहिल्या भागात दाखवता आला नाही. त्यांची इच्छा असावी, या सर्व गोष्टी पुन्हा दाखवाव्यात. त्यामुळे ते अशा पद्धतीने वक्तव्य करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे आणि उरलेली शिवसेना संपविण्याची सुपारी राऊत यांनी शरद पवार यांच्याकडून घेतली असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला. धर्मवीर आनंद दिघे आम्ही जगतो, दिघे यांचे आत्मचरित्र लोकांसमोर आणणे हा राजकीय स्वार्थ नसून सामाजिक स्वार्थ असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader