ठाणे : विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. ” भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा ” या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण राज्यभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वातावरण आहे. सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षेची जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये काही अंशी परीक्षेबाबत भीती दिसून येत असते. याच पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे स्वागत करणे, परीक्षेसाठी शुभेच्छा देणे यांसह परीक्षा केंद्राबाबत रीतसर माहिती देणे यांसारख्या अनेक उपक्रम स्थानिक शाळांकडून राबविण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी भयमुक्त राहून परीक्षा द्यावेत यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्र लिहले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे.

भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्याची मानसिक तयारी करावी, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पत्रात लिहले आहे. तसेच आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटीबध्द आहे. परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पुर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे आणि न्याय्य मार्गाने शिक्षणाला पुढे नेऊयात, असे ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.