तरुणांकडून भाजीविक्रीपासून ऑनलाइन प्रशिक्षण वर्गापर्यंत व्यवसाय; विपणनासाठी समाजमाध्यमांची मदत

आशीष धनगर, लोकसत्ता

Pune Man Expressed Unique Agitation About The Bad Roads In Pune Video goes Viral on social media
पुणेकर काकांचा नाद नाय! खराब रस्त्यांना कंटाळून महानगरपालिकेच्या गेटवर केलं पुणेरी स्टाईल आंदोलन; VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
Chandrapur District Bank Recruitment , AAP ,
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरणाची ‘ईडी’कडे तक्रार
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
Life in an IIT | Accessible buildings, transformative experience: Here’s journey of Pune boy to IIT Bombay
‘हारा वही, जो लड़ा नही’ पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास ऐकून थक्क व्हाल
abscond criminal detained under mpda act
‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरारी झालेल्या गुंडाला अटक; कारवाई टाळण्यासाठी डोंगरात वास्तव्य

ठाणे : करोनाच्या संकटामुळे बाजारात निर्माण झालेली मंदी, नोकऱ्यांमधील कपात अशा विविध कारणांमुळे चिंता व्यक्त होत असली तरी काही महाविद्यालयीन तरुणांनी या मंदीचे रूपांतर संधीत करून व्यवसाय सुरू केले आहे. टाळेबंदीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत भाजीपाला, केकविक्री, घरगुती खानावळ, ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग अशा छोटय़ा व्यवसायांच्या माध्यमातून हे तरुण अर्थार्जन करत आहेत.

टाळेबंदीच्या काळात ठाणे आणि डोंबिवलीतील काही तरुणांना व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. ठाण्यातील वर्तकनगर परिसरात राहणारी प्रियंका पाटोळे यापैकीच एक. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात नागरिकांना भाजीपाला मिळवण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रियंकाने एप्रिलपासून नागरिकांना थेट भाजीपाला पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. नाशिक आणि पुण्यातील काही शेतक ऱ्यांकडून भाजीपाला घेऊन ती आपल्या परिसरात विक्री करते. यातून चांगला नफा मिळत असल्याने हा व्यवसाय यापुढेही सुरूच ठेवण्याचा मानस तिने व्यक्त केला.

ठाण्यात राहणारा ऋषी जयस्वाल हा मुलुंडच्या एमसीसी महाविद्यालयात शिकतो. ऋषीला जेवण बनवायची आवड आहे. टाळेबंदी सुरू झाल्याने शहरातील सर्वच रेस्टॉरंट आणि हॉटेल बंद असल्याने खवय्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याची ही नामी संधी असल्याते ऋषीने ओळखले. त्याने त्याच्या काही मित्रांसोबत होम किचन सुरू करण्याचे ठरवले. त्याने बनवलेल्या जेवणाच्या जाहिराती करण्यास सुरुवात केली. बघताबघता ऋषीला शाकाहारी-मांसाहारी जेवणाच्या दररोज मागणी येऊ लागली. ऋषीला ठाण्यातील घोडबंदरपासून मुलुंडपर्यंतच्या नागरिकांच्या जेवणाच्या दररोज तीन ते चार ऑर्डर येतात. त्यातून ऋषी दररोज दोन ते तीन हजारांची कमाई करतो आहे. डोंबिवली हिमानी पाटील हिने टाळेबंदीच्या कालावधीचा वापर तिच्या केक बनविण्याच्या कलेची जाहिरात करण्यासाठी वापरला. हिमानीने समाजमाध्यमांवर पेज तयार करून केकच्या आकर्षक जाहिराती केल्या. त्यामुळे टाळेबंदीत केकची दुकाने बंद असल्याने अनेक ग्राहकांनी या पेजच्या माध्यमातून वाढदिवस साजरे करण्यासाठी केक बनविण्याच्या ऑर्डर हिमानीला देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हिमानीला दररोज तीन ते चार केक बनविण्याच्या आर्डर येत असून त्यातून हिमानीला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे ती सांगते. निकिता रावळ ही ठाण्यातील घोडबंदर भागात राहते. ‘कॅलिग्राफी’ची आवड असणाऱ्या निकिताने टाळेबंदीच्या काळात ‘गुगल मीट’च्या साहाय्याने घरी असणाऱ्या काही विद्यार्थ्यांसाठी कॅलिग्राफीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या प्रशिक्षणासाठी निकिता काही शुल्क आकारते. त्यातून तिला चांगले पैसै मिळत आहेत.

Story img Loader