प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
आसाम येथील गुवाहाटी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा विभागाच्या ‘राष्ट्रीय एकात्मता शिबिरात’ सहभागी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या स्वयंसेवकांचा आणि स्वयंसेवक प्रमुख प्राचार्य एस. वि. देशमुख यांचा विद्यापीठातर्फे प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे डॉ. अनिल पाटील आणि विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक बाबसाहेब बिडवे उपस्थित होते. विद्यपीठाच्या पदवीदान सभागृहाच्या प्रांगणामध्ये हा गौरव सोहळा पार पडला.
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे संस्कार आहे. या संस्कारामधून माणूस घडला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना हा केवळ दोन वर्षांकरिता उपक्रम न राहता तो नित्यनियम झाला पाहिजे. आपल्या कृतीचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला स्वयंसेवकांकडून मदत झाली पाहिजे, असे डॉ. अनिल पाटील यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले. या वेळी त्यांनी आपल्या विद्यार्थीदशेतील उल्लेखनीय कामगिरीचे दाखले दिल. तसेच जीवनदीप संस्थेच्या गोवेली आणि खर्डी महाविद्यालयाच्या ग्रामीण भागातील स्वयंसेवकांच्या सहभागाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी आपली मते मांडताना या शिबिरातील अनुभव सांगितले. या शिबिरामुळे स्वयंसेवकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण झाली. तसेच वेळेचे व्यवस्थापन, जगाला हेवा वाटेल अशा आपल्या संस्कृतीचे महत्त्व राष्ट्रीय पातळीवर गेल्यावर समजले. या शिबिराचा उपयोग विविध भाषिक एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी होतो. यातून संस्कृतीची देवाणघेवाण होऊन एकात्मता निर्माण होते, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा