ठाणे : महापालिका क्षेत्रात झालेल्या पहिल्या पावसानंतर रस्त्यालगत असलेल्या विद्युत वाहिन्या जळण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. अशा घटनांमुळे विजेचा धक्का लागून जिवितहानी होण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाने विशेष मोहिम हाती घेऊन शहरातील पथ दिव्यांचे खांब आणि त्यांना जोडण्यात आलेल्या विद्युत वाहिन्यांची तपासणी सुरू केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ४३ हजारांच्या आसपास पथदिवे आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, उद्यान तसेच लोकवस्तीत हे पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. या पथदिव्यांसाठी रस्त्याच्या बाजूने विद्युत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. काही वेळेस खोदकामादरम्यान वाहिन्यांना धक्का लागून त्या अर्धवट तुटतात. पावसाळ्यात त्या भागात पाणी साचल्यानंतर वाहिन्यांमधून प्रवाहित होणारा वीजेचा प्रवाह पाण्यात उतरतो. यामुळे वीजेचा धक्का बसून जिवीतहानी होण्याची शक्यता असते. काही वेळेस वाहिन्या जळण्याचे प्रकार घडतात. यंदा पहिल्याच पावसानंतर असे प्रकार समोर येऊ लागले आहेत. दोन दिवसांपुर्वी सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या नौपाडा परिसरातील बी केबीन भागातील रस्त्यालगत एक विद्युत वाहीनी जळून परिसरात धुर पसरला होता. तसेच तेथे साचलेल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह उतरला होता.

in pune Cyber thieves stole 70 lakh from two senior citizens by impersonating police in separate incidents
पोलीस असल्याच्या बतावणीने ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक, कारवाईची भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
businessman targeted by cybercriminals and his friend attempted to extort ₹25 lakhs
खंडणीसाठी मित्राने पातळी सोडली, झाले असे की …
CCTV, Thane district, Thane, Thane latest news,
उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही
Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
police patrolling for women safety during festivals thane news
उत्सवांच्याकाळात महिला सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीसांची गस्त
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
Kidnap of priest, ransom, Karnataka, loksatta news,
पाच कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह शिष्यांचे अपहरण, कर्नाटकातून तिघे अटकेत

हेही वाचा >>> राज्यमार्गाशेजारीच्या अतिक्रमणांवर एमआयडीसी कार्यालयाकडून कारवाई, अतिक्रमणमुक्त रस्ता ठेवण्याचे आव्हान

याठिकाणी वाहिन्या टाकण्याच्या कामासाठी खोदाई करण्यात आली होती. या कामामुळेच वाहिनी तुटून हा प्रकार घडल्याचा अंदाज विद्युत विभागाकडून वर्तविला जात आहे. कळवा परिसरात पथ दिव्याच्या खांबाला वीजेचा धक्का लागून एका श्वानाचा मृत्यु झाला आरोप करण्यात आला होता. परंतु या खांबाला विजेचा धक्का लागत नसल्याने श्वानाचा मृत्यु इतर कारणामुळे झाल्याचा दावा पालिकेने केला होता. खांबाला विजेचा धक्का लागत नसल्याचा पुरावा म्हणून पालिकेने चित्रफित प्रसारित केली होती. असे असले तरी पहिल्या पावसानंतर अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या जळण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. अशा घटनांमुळे विजेचा धक्का लागून जिवितहानी होण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी पालिकेने पाऊले उचलली असून त्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये पथके नेमणून प्रत्येक विद्युत खांब आणि त्यांना जोडणाऱ्या विद्युत वाहिन्यांची तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली-कल्याणमधील रस्त्यांवर खड्डे कायम; पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. याशिवाय गॅस, इंटरनेट, दूरध्वनीच्या वाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. या कामादरम्यान अनेक ठिकाणी वाहिन्या धक्का लागून त्या अर्धवट अवस्थेत तुटल्या असू शकतात. याच भागात पावसाचे पाणी साचले तर दुर्घटना घडू शकते. हि बाब लक्षात घेऊन पालिकेने विशेष मोहिम हाती घेऊन विद्युत वाहिन्यांची तपासणी सुरू केली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे शहरातील पथदिव्यांचे खांब तसेच त्याला जोडण्यात आलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे वीजेचा धक्का लागून दुर्घटना होऊ नये यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. विद्युत विभागाची पथके प्रत्येक विद्युत खांब आणि त्यांना जोडणाऱ्या विद्युत वाहिन्यांची तपासणी करीत आहेत. – शुभांगी केसवानी उपनगर अभियंता, विद्युत विभाग, ठाणे महापालिका