ठाणे जिल्हा प्रशासनाचे अभियान, शहापूर, मुरबाडमध्ये महिनाभरात १०,१८० घनमीटर उपसा

ठाणे : धरण आणि तलावांमधील पाणीसाठय़ात वाढ आणि शेतीत गाळाच्या साह्याने सुपीक माती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील तलावांमधून गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जलसंधारणासाठी काम करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळ आणि भारतीय जैन संघटना यांच्या मदतीने जिल्हा परिषदेमार्फत हे अभियान राबविले जात आहे. याबाबतचा शासन निर्णय मार्च २०२३च्या अखेरीस जाहीर झाला. सध्या राज्यातील जलसाठय़ांत अद्याप ४४ कोटी घनमीटर गाळ शिल्लक आहे. त्यामुळे हे अभियान कायमस्वरूपी राबवले जाणार आहे. जलसाठय़ातील पाण्याचे कमी प्रमाण आणि शेतातील पिके काढण्यात आल्यानंतर हा उपक्रम राबवता येणे शक्य आहे. यासाठी फारच कमी कालावधी मिळतो. जलसंधारणासाठी गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळ व भारतीय जैन संघटनेने यात सहभाग घेतला आहे.

१५ हजार रुपये अनुदान

गाळउपसा करण्यासाठी याआधी केवळ इंधन खर्च दिला जात होता. मात्र सध्या यंत्रसामग्री आणि इंधन खर्चही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गाळ वाहून नेण्यासाठी अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
shivjal surajya campaign by thane zilla Parishad tackles rural water scarcity for one month
शिवजल सुराज्य अभियानाचे काम प्रगतीपथावर, महिन्याभरात ६१९ वनराई बंधारे बांधण्याचे काम पूर्ण
Pune Municipal Corporation starts implementation of Swanidhi se Samruddhi scheme Pune print news
पीएम स्वनिधीसाठी होणार सर्वेक्षण !
municipality is redirecting overflowing Vihar Lake water to Bhandup purification center
विहार तलावाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात, विहार उदंचन केंद्राचे बांधकाम करण्याचा पालिकेचा निर्णय
Environmental clearance from the state itself revised notification issued by the central government Mumbai news
राज्यातूनच पर्यावरणविषयक परवानगी, केंद्र सरकारकडून सुधारित अधिसूचना जारी; गृहप्रकल्पांना दिलासा
researchers at iit bombay suggested measures to deal with future economic crises
नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात आर्थिक संकट; आयआयटी मुंबईने सुचविल्या उपाययोजना
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन

७२ ठिकाणी कामाचे नियोजन

लघुपाटबंधारे विभागांतर्गत एप्रिलमध्ये झिडके, कोन, केल्हे तालुका भिवंडी, टेंभा तालुका शहापूर, कुडवली तालुका मुरबाड येथे कामाला सुरुवात झाली. भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या पाच तालुक्यांत पहिल्या टप्प्यात ३६ कामांची सुरुवात करण्यात आली. तर ७२ ठिकाणी मोसमीपूर्व कामांचे नियोजन असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाचे प्रमुख दिलीप जोकार यांनी दिली.

Story img Loader