बदलापूरः बहुप्रतिक्षित कल्याण मुरबाड रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली असून लवकरच या कामासाठी भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. या प्रकल्पाची ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर या मार्गाच्या उभारणीसाठी निविदा काढली जाणार असून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे कल्याण मुरबाड रेल्वेची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपणार आहे.

हेही वाचा >>>माघी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मलंग गडावर

Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rajewadi Station , Purandar Airport ,
पुणे : राजेवाडी स्थानकापासून पुरंदर विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका, एकात्मिक वाहतूक आराखड्यात प्रकल्प प्रस्तावित
Redevelopment Building Permit Terms and Conditions
एकाचा पुनर्विकास दुसऱ्याला नसावा त्रास
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Country first semiconductor project to be completed by December print eco news
देशातील पहिला अर्धसंवाहक प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्णत्वाला
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
traffic stopped due to snake crossing road on khambatki ghat
सातारा : सरपटणाऱ्या जीवासाठी खंबाटकी घाट थांबला

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षित असलेली कल्याण मुरबाड रेल्वेच्या कामात गेल्या काही महिन्यात कमालीची प्रगती झाली आहे. काही महिन्यांपूर्वी याच्या सर्वेक्षणाला सुरूवात झाली. जुलै महिन्यात राज्य सरकारने या प्रकल्पासाठी आपला वाटा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारनेही तातडीने रेल्वे प्रशासनाला याबाबतचे हमीपत्र दिले. त्यानंतर या कामाला गती प्राप्त झाली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या मार्गाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. आता यात आणखी एक टप्पा मार्गी लागत आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या रेल्वे प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती दिली आहे. जमीन अधिग्रहणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून दोन दिवसांत मध्य रेल्वेला पत्र पाठविण्यात येईल. त्यानंतर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. जमीन अधीग्रहण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेची निविदा काढण्यात येईल. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणेपर्यंत दोन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली. त्याबाबतही रेल्वेमंत्र्यांनी शाश्वत केले आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

Story img Loader