ठाणे : ठाणे जिल्ह्यात अनेक आमदार आहेत. परंतु असे असताना साताऱ्याचा माणूस ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री बसवून ठेवला जात आहे. येथे कोणाला कामच करुन द्यायचे नाही. येथे केवळ एकाधिकारशाही सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

नवरात्रोत्सवा निमित्ताने टेंभीनाका येथील देवीचे दर्शन आणि आरती माजी खासदार राजन विचारे यांनी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. येथील उद्योग गुजरातला नेले जात आहेत, येथून तरुणांंना बेरोजगार करण्याचे काम या राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगले सरकार या निवडणुकीत जनता निवडून आणले यासाठी पाठीशी राहावे असा आर्शिवाद मागितला असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ठाणे महापालिकेची अवस्था वाईट आहे. तीन तीन वर्ष ठेकेदारांचे देयक दिले गेले नाही. महापालिकेच्या निधीसाठी आयुक्त दर एक तारखेला मुख्यमंत्र्यांकडे कटोरा घेऊन जातात. आम्ही ठाणे महापालिकेत काम केले आहे. परंतु आता रुपयातले ६० पैसे भ्रष्टाचारासाठी द्यावे लागत आहे अशी टीकाही विचारे यांनी केली.

Ratnagiri, Rajesh Sawant Ratnagiri BJP,
उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यातच उद्योग आजारी पडत आहेत, त्याकडे लक्ष देण्याची गरज – भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
मंत्रालयात विधानसभा उपाध्यक्षांसह आमदारांच्या जाळ्यांवर उड्या मुख्यमंत्री भेट देत नसल्याने टोकाचे पाऊल
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
Chhatrapati Sambhajinagar, Amravati,
अमरावती, छत्रपती संभाजीनगरच्या ज्वारी खरेदी उद्दिष्टाला कात्री; अकोल्यासह पाच जिल्ह्यांच्या…
Eknath shinde MP Prataprao jadhav over Light bill
“आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलं नाही, हजार रुपये इंजिनिअरला देतो अन्…”, शिंदे गटाच्या खासदाराचं विधान चर्चेत
Eknath Shinde Buldhana, Congress leaders Buldhana,
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात घुसण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न; काळे झेंडे दाखविले
Local representatives upset over the interference of MLAs in Nagpur in the planning of iron ore and other minor mineral funds
गडचिरोली जिल्हा खनिज निधीवर नागपुरातील आमदारांचा डोळा?; जिल्हाबाहेरील कंत्राटदारांची रेलचेल वाढली

हेही वाचा >>>प्रदुषणाकारी इंधन वापरणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील बेकऱ्यांना नोटिसा

मुंबई महापालिकेची अवस्था देखील वाईट आहे. निवडणूक घ्यायला हे लोक मागत नाही. हे सरकार फक्त खूर्चीसाठी काम करत आहेत. त्यांचे लोक येऊन भूलथापा देत आहेत असेही ते म्हणाले. पक्ष चिन्हाबाबत न्यायालयात न्याय मिळत नाही. अडीच वर्ष सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत. जनतेच्या न्यायालयात आम्हाला कौल मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.