लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : दरवर्षीप्रमाणे यंदाही जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस तळ गाठतो आहे. अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाने तळ गाठल्याने बुधवार, १९ जूनपासून अंबरनाथकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंगळवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला.

Ambernath, Badlapur, water,
अंबरनाथ, बदलापुरकरांनो पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घ्या, जीवन प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन; तक्रारीसाठी क्रमांक जाहीर
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Mumbai local 24 years ago old video goes viral
मुंबई लोकलमध्ये २५ वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? सोशल मीडियावर व्हायरल झालेला Video पाहाच
thane municipal corporation
ठाण्यात शुक्रवार आणि शनिवारी पाणी नाही, महापालिकेच्या पाणी योजनेतील दुरुस्ती कामांमुळे पाणीपुरवठा बंद
Ambernath Municipality,
अंबरनाथ पालिका म्हणते वालधुनी नदी नव्हेच ! बांधकाम प्रकरणात स्पष्टोक्ती
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Tender, construction,
अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निविदा, ४३० खाटांच्या रुग्णालयाचीही उभारणी होणार

अंबरनाथमधील सुमारे एक लाख लोकवस्तीला चिखलोली धरणातून दररोज सहा दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. तर अंबरनाथमधील मोठ्या भागाला बदलापूर येथील बॅरेज बंधारा आणि बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दुसरीकडे बदलापूर शहरातही हेंद्रेपाडा येथील जलवाहिनीला मंगळवारी गळती लागल्याने बुधवारी पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. तर गुरुवारीही काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे.

आणखी वाचा-भाज्या महागल्या; वातावरण बदलाचा फटका

यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्याने सर्वच जलाशयातील पाणीसाठा कमी झाला आहे. बहुतांश ठिकाणी पाणी कपात सुरू करण्यात आली असली तरी ठाणे जिल्ह्यात अद्याप अधिकृतरित्या पाणी कपात जाहीर केलेली नाही. मात्र देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणी कपात केला जात असल्याचा आरोप होतो आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात पाणीसाठा २५ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. तर अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणानेही तळ गाठला आहे. त्यामुळे मंगळवारी अंबरनाथ शहराचे पाणी व्यवस्थापन पाहणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चिखलोली धरणातून ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला.

बुधवार, १९ जून पासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यामुळे चिखलोली धरणातून पूर्वेतील ज्या भागात पाणी दिले जाते त्या भागातील नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे लागणार आहे. ऐन पावसाळ्यात पाणी कपात झाल्याने नागरिकांसमोर मोठे आव्हान आहे. अंबरनाथ शहराला बारवी धरण, बदलापुरातील उल्हास नदीवरील बॅरेज बंधारा येथून पाणी दिले जाते.

आणखी वाचा-तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंद करू, डोंबिवली एमआयडीसीतील युवा उद्योजकांची उव्दिग्नता

बदलापुरातही पाणीबाणी

बदलापुरात पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागातील आमराई परिसरातील जलवाहिनीला गळती लागल्याने काही भागात बुधवार आणि गुरुवार अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे बदलापूरकराना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.