मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात बेमुदत उपोषण पुकारले आहे. टोल दरवाढ झाल्याने हे उपोषण सुरू केले असून मनसे नेहमी आक्रमक भूमिका घेते असा ठपका आहे. हा ठपका पुसण्याकरता हे उपोषण सुरू करण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

अविनाश जाधव म्हणाले की, “आतापर्यंत अनेक अधिकारी भेटून गेले. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारचे अधिकाही भेटायला आले होते. १ तारखेपासून जी टोल दरवाढ झाली आहे, त्याला तत्काळ स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे. त्याबाबतीत ते ठोस निर्णय द्यायला तयार नाहीत. त्यामुळे उपोषण सुरू ठेवलं आहे. “

Badlapur Harassment case Suspension of Thane Education Officers for evading case responsibility Mumbai news
बदलापूर अत्याचार प्रकरण: जबाबदारी झटकल्याने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Live in relationship
“लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांना संरक्षण दिलं पाहिजे, मग ते विवाहित असले तरीही”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
3 people suffered with severe eye damage due to lasers light in kolhapur
कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा

हेही वाचा >> “एकनाथ शिंदेंना मला प्रश्न विचारायचा आहे की…”, टोल दरवाढीसंदर्भात राज ठाकरे संतापले, म्हणाले…

मागच्या अनेक वर्षांपासून समाजात एक ठपका आहे की मनसे नेहमी आक्रमक आंदोलन करते. तोडफोड करते. या ठपक्यासाठी माझं हे शांततेचं आंदोलन होतं. पण त्यांनाही कळूदेत की मनसे स्टाइलने आंदोलन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रिझल्ट मिळतो, पण शांततेत आंदोलन करताना आठ आठ दिवस बसावं लागतं. त्यामुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेलाच मार्ग योग्य होता. आमच्या हातची भाषा कळत नाही तोवर निर्णय होत नाही. आमचा गांधी सप्ताह आज संपणार आणि उद्यापासासून भगतसिंहांचा मार्ग अवलंबणार, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे.

“टोलनाक्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात धर्मवीर आनंद दिघेंनी १९९९ साली सुरू केली होती. त्यावेळेला हा टोल सुरूही झाला नव्हता. २०१६ मध्ये एकनाथ शिंदे यांनी याचिकाही दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने असं म्हटलं होतं की स्वतः मंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा. त्यानंतर ते मंत्री झाले तेव्हा त्यांनी याचिका मागे घेतली.आता टोलबंदीवर सोडा, टोल दरवाढीवरही ते काही बोलत नाहीत, अशीही टीका त्यांनी केली.

राज ठाकरेंनी घेतली भेट

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी उपोषण मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अविनाश जाधव आता उपोषणा मागे घेणार आहेत. उपोषण मागे घेतल्यानंतर मनसे या प्रश्नी काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.