लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: ठाणे जिल्हयातील शहरांमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सायंकाळी कामावरून घरी परतत असलेल्या नोकरदार वर्गासह नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. यामुळे सर्वच शहरांमधील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु होती. पाऊस थांबताच येथील पाणी ओसरले.

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
When will daily water supply be provided to Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडला दररोज पाणीपुरवठा कधी होणार? आयुक्तांची महत्वाची माहिती
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण

ठाणे, भिवंडी, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. दुपारपासूनच काळे ढग दाटून आल्याने सर्वत्र अंधारमय वातावरण होते. सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरांमधील सखल भागात पाणी साचले होते. ठाणे शहरातील माजिवडा चौक, वंदना सिनेमागृह परिसर, नौपाडा या भागात पाणी साचले होते.

हेही वाचा… येऊरमधील बेकायदा बंगल्यांवरील कारवाई थांबली; कारवाईसाठी तक्रारदाराचे येऊरमध्ये उपोषण सुरू

ठाणे शहरात बुधवारी सायंकाळी ३.३० ते ४.३० वाजेपर्यंत ८. १३ मिमी पावसाची नोंद झाली. कल्याण शहरातील शिवाजी चौकात पाणी साचले होते आणि कल्याण स्थानक परिसरात पाणी साचले. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे सर्वच शहरांमधील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु होती. घोडबंदर, माजिवडा, मुंबई-नाशिक महामार्ग तसेच शिळफाटा येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले.

Story img Loader