ठाणे- जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० या एक तासाच्या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला असल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे.

जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसाने हजेरी लावली नव्हती. यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता. या उकाड्याने नागरिक देखील हैराण झाले होते. परंतु, जिल्ह्यात बुधवारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गुरुवारी देखील पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. यामुळे सकाळी कामाला जाणार्‍या नागरिकांची तसेच शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला. यामुळे शहरातील पेढ्या मारुती रोड, वंदना बस डेपो जवळ पाणी साचले होते. जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर तसेच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस पडत आहे.

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
Temperature drop in Mumbai, Temperature ,
मुंबईच्या तापमानात घट

हेही वाचा – डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय कचऱ्याचे ढीग, प्रशासनाचे दुर्लक्ष; घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्णांना संसर्गाची भीती

कल्याण डोंबिवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षा चालकांना वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरातही पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. नाले सफाईची काम योग्य रीतीने झाली नसल्यामुळे शहराच्या अंतर्गत भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत., काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. कल्याण शहरात शिवाजी चौक, खडकपाडा, गांधारी, टिटवाळा आणि २७ गावातील अनेक भागात पाणी साचले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत देवीचापाडा येथे खारफुटीवर मातीचा भराव, शासनाने घेतली गंभीर दखल

अंबरनाथ, बदलापुरात संततधार पाऊस

अंबरनाथ, बदलापूरसह आसपासच्या भागात गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझीम असलेल्या पावसाने अर्धा तासात जोर धरला. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला. कल्याण बदलापूर रस्त्यावर सकाळी पाणी साचले नसले तरी वाहतूक संथगतीने सुरू होती. मात्र धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने नागरिकांत समाधानेच वातावरण आहे.

Story img Loader