लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पश्चिमेतील गांधारी नदीच्या पात्रातील झाडे तोडून तेथे भराव टाकून बेकायदा बांधकामे उभारणीसाठी जोरदार तयारी भूमाफियांनी सुरू असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. रात्रीच्या वेळेत जेसीबीच्या उजेडात ही कामे केली जात असल्याचे रहिवाशांनी सांगितले. दिवसा या जागेत कोणी दिसत नाही. पण रात्री आठ वाजल्यानंतर गांधारी नदीच्या काठी ट्रक, जेसीबी, कामगारांची पहाटे चार वाजेपर्यंत वर्दळ असते. रात्रीच्या वेळेत झाडे तोडून ती रात्रीच गायब करुन टाकली जातात. तोडलेल्या भागात सीमेंटचा राडारोडा, भरावाची माती आणून टाकली जाते. नदीला खेटून ही कामे केली जात आहेत. पोलीस, स्थानिक महसूल अधिकारी यांना या महत्वपूर्ण विषयाची चाहूल लागत नसल्याने पर्यावरणप्रेमी, परिसरातील रहिवासी हैराण आहेत.

Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण
pune municipal corporation winding road from siddhivinayak college to cummins college
कमिन्स महाविद्यालयाजवळील वाहतूक कोंडी सुटणार ? अडथळा ठरणारी भिंत तसेच दुकाने महापालिका प्रशासनाने काढली
Cracks appear in Butibori overbridge, closed for traffic
निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला, गडकरींवर नामुष्कीची वेळ!, ‘एनएचआय’ने हात झटकले, आमदाराचे मौन
Woman killed five injured in horrific accident on Samruddhi Highway Nagpur news
समृद्धी महामार्ग: दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे; महिला ठार, पाच जखमी
State Tribal Development Minister Ashok Uike appointed as Guardian Minister of Chandrapur district print politics news
पंधरा वर्षानंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री; जिल्ह्यातील आमदारांना सांभाळून काम करण्याचे आव्हान

कल्याण, डोंबिवलीतील आरक्षित भूखंड, सरकारी जमिनी बेकायदा बांधकामे करुन हडप केल्यानंतर भूमाफियांनी आपला मोर्चा आता गांधारी नदी पात्राकडे वळविला आहे. गांधारी नदी भागातून येत्या काळात मुंबई-बडोदा रस्ता, विरार-अलिबाग द्रुतगती मार्ग, गांधारी पुला जवळ दुसरा जोड पूल उभारण्यात येणार आहे. वाहतुकीचे मोठे केंद्र येत्या काळात गांधारे परिसर होणार असल्याने त्यापूर्वीच मोक्याची जागा हडप करण्यासाठी भूमाफियांनी गांधारी नदी पात्रात जेसीबीने उकरुन तेथे मातीचे भराव टाकून बेकायदा बांधकामांची तयारी सुरू केली आहे, असे स्थानिकांनी सांगितले. अशाप्रकारे नदी पात्र भराव टाकून बंदिस्त केले जाऊ लागले पुराचे पाणी परिसरात पसरणार आहे अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली.

हेही वाचा… मुंबईतील रिक्षा चालकाची डोंबिवलीत दादागिरी, महिलेला जखमी करुन पळण्याचा प्रयत्न

हेही वाचा… ठाण्यात वर्षभरात ८५७१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत; यंदा पाणी देयंकाच्या वसुलीत १४ कोटी रुपयांनी वाढ

भूमाफिया दहशत, शस्त्र सज्ज असल्याने कोणीही रहिवासी त्यांच्या या बेकायदा बांधकामाला विरोध करण्यासाठी पुढाकार घेत नाही. याविषयी रहिवासी महसूल विभाग, पोलीस, पालिकेकडे तक्रारी करण्यास घाबरत आहेत. पोलिसांची रात्रभर गस्त सुरू असते. त्यांना ही नदी पात्रातील हालचाल दिसत नाही का, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. महसूल विभाग, पोलिसांनी संयुक्तपणे नदीपात्रात टाकण्यात आलेले भराव उद्धवस्त करून टाकावेत, अशी मागणी रहिवासी करत आहेत.

Story img Loader