लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, सरोवरनगर, कुंभारखाणपाडा, राजूनगर भागातील नागरिकांना दररोज पुरेसा पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून कुंभारखाणपाडा येथे तीन वर्षापूर्वी जलकुंभासाठी एक जागा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून पालिकेकडून निश्चित करण्यात आली होती. या जागेवर बेकायदा झोपड्या स्थानिकांनी उभारल्या आहेत. त्या तोडून देण्यास स्थानिक भाई विरोध करत असल्याने, पालिकेने तीन वर्ष या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली नाही. त्यामुळे जलकुंभ उभारणीचे काम रखडले असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार चव्हाण यांनी पालिका वरिष्ठांसह पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत फैलावर घेतले.

Kalyan Dombivli Municipal Administration will close Thakurli Chole village lake for maintenance during Ganapati visarjan
ठाकुर्ली चोळेतील तलाव गणपती विसर्जनासाठी बंद
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
River Life-giving Riverside River Description
तळटीपा: नदीच्या किनारी…
Loksatta anvyarth Why is Maharashtra which is leading the country in various economic and social sectors declining
अन्वयार्थ: महाराष्ट्र का थांबला?
mohan bhagwat
एका-दोघांमुळे राष्ट्र मोठे होत नाही- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
Residents of Dombivli are troubled by ganja den in Maharashtranagar
डोंबिवलीत महाराष्ट्रनगरमधील गांजाच्या अड्ड्याने रहिवासी त्रस्त
Water supply shortage in Malad West Goregaon West on January 25 due to leakage
गोरेगाव, मालाडमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद
Jaljeevan Abhiyan work in state stalled Raju Shetty demands funds to C R Patil
राज्यातील जलजीवन अभियानाची कामे रखडली, राजू शेट्टी यांची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे निधीची मागणी

मुंबईत सोमवारी भाजप प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्यासह पालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची डोंबिवलीतील विकास कामे विषयावर बैठक घेतली. या बैठकीत आमदार चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, सरोवर नेहमीच पाणी टंचाई असते. या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण स्वत साडे तीन वर्षापूर्वी कुंभारखाणपाडा भागात या परिसरासाठी एक स्वतंत्र जलकुंभ (सम्प-पप्म) उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. यासाठी एक जागा निश्चित केली होती. त्या जलकुंभाची उभारणी कुठपर्यंत झाली आहे, या जलकुंभाच्या उभारणीत कोणते अडथळे आहेत, असे प्रश्न आमदारांनी केले.

आणखी वाचा-उल्हासनगरात आणखी दोन बांगलादेशी पकडले,गुन्हे शाखा आणि विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई

यावेळी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी कुंभारखाणपाडा येथील जलकुंभाच्या प्रस्तावित जागेवर स्थानिकांनी बेकायदा बांधकामे केली आहेत. ही बांधकामे तोडून देण्यास स्थानिक विरोध करत आहेत. अधिकाऱ्यांचे हे बोल ऐकताच आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अशी तकलादू कारणे देऊन तुम्ही विकास कामे करण्यात चालढकलपणा करता. साडे तीन वर्षात तुम्ही भुक्कड भूमाफिया जलकुंभाच्या जागेवरील बेकायदा बांधकामे तोडण्यास विरोध करतात म्हणून प्रशासन तेथे जलकुंभ उभारणी करत नाही, हे चुकीचे आहे.

कुंभारखाणपाडा परिसरातील पाणी टंचाईचा विचार करून पालिकेने ही बेकायदा बांधकामे तातडीने तोडून जलकुंभाची कधीच उभारणी सुरू होणे आवश्यक होते. या कामासाठी निधी मंजूर आहे. ठेकेदाराला कामाचे आदेश आहेत. असे असताना प्रशासन यामध्ये चालढकलपणा करत आहे. जलकुंभाच्या जागेवरील बेकायदा बांधकामे कोणाचाही दबाव आला तरी तो झुगारून तातडीने भुईसपाट करा. तेथील जलकुंभ उभारणीचे काम तातडीने सुरू करावे, असे आदेश आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आणखी वाचा-कल्याणमध्ये इमारतीवरील सौरपट्ट्या साफ करताना तोल जाऊन मजुराचा मृत्यू

या भागात वर्चस्व असलेला एका राजकीय पुढारी या सर्व कामांत अडथळे आणत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. पालिका अधिकाऱ्यांनाही या राजकीय पुढाऱ्याचा त्रास आहे. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली असल्याचे समजते. आमदार चव्हाण यांनी या कामात अडथळे आणणाऱ्यांवर पालिकेने थेट कारवाई करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

Story img Loader