अंबरनाथ : विविध औषधोपचार करत असूनही लग्नाच्या १२ वर्षांनंतरही मूलबाळ होत नसल्याने पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या पश्चिमेतील आयुध निर्माण संस्थेच्या निवासी वसाहतीत हा प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

अंबरनाथच्या आयुध निर्माण संस्थेच्या क्रीडांगणासमोर रोनीतराज मंडल (३७) हा त्याची पत्नी नीतू कुमारी मंडल (३०) हिच्यासोबत वास्तव्याला होता. मूळच्या बिहारमधील असलेल्या या दोघांचे २०११ साली लग्न झाले होते. २०१६ साली रोनीतराज हा आयुध निर्माण संस्थेत जोडारी म्हणून कामाला लागला. आयुध निर्माण संस्थेत एच ३८ या कामगार वसाहतीत हे दाम्पत्य वास्तव्याला होते. त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली, तरी त्यांना मूलबाळ होत नसल्याने नीतू कुमारीवर उपचार सुरू होते. मात्र रोनीतराज हा याच कारणावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी तिच्याशी वाद घालत होता.

Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
Crime News
Crime News : TikTok वर व्हिडीओ पोस्ट करण्यावरून पोटच्या १५ वर्षीय मुलीचं ‘ऑनर किलिंग’; US मधून पाकिस्तानात परतल्यानंतर बापाने घातल्या गोळ्या
How every sexual intercourse is rape with promise of marriage
विवाहाच्या वचनाने केलेला प्रत्येक शरीरसंबंध बलात्कार कसा?
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?
children of divorced parents at higher risk of a stroke
आई-वडिलांचा घटस्फोट मुलांसाठी ठरतोय जीवघेणा? कारण काय? नवीन संशोधन काय सांगते?
Man sets himself on fire
पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास दिला नकार, पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

हेही वाचा – अति धोकादायक इमारती रिकाम्या करा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

रविवारी दुपारी रोनीतराज याने मद्यपान केल्यानंतर तो जेवत असताना त्याचे पत्नीसोबत पुन्हा वाद झाले. हा वाद सुरू असताना त्याने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या केली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्याने शेजाऱ्यांना बोलावत आपल्या पत्नीची कुणीतरी हत्या केल्याचा बनाव रचला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. मात्र रोनीतराज सांगत असलेल्या गोष्टीवर संशय आल्याने पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेत चौकशी सुरू केली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत नीतू कुमारी हिचा पती रोनीतराज यालाच संशयित म्हणून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

Story img Loader