डोंबिवली : येथील औद्योगिक क्षेत्रातील भागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मुबलक पाणी येत नसल्याने रहिवासी हैराण आहेत. अनेक रहिवासी विकतचे पाणी आणून घरात वापरत आहेत. एमआयडीसी परिसरात नव्याने गृहसंकुले उभी राहत आहेत. या भागाचा पाणी पुरवठा त्या भागात वळविला जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी पाणी टंचाईची परिस्थिती यापूर्वी नव्हती. नवीन गृहसंकुले वाढल्यापासून हे प्रकार सुरू आहेत, असे रहिवाशांनी सांगितले. या कमी दाबाच्या पाणी टंचाई बाबत एमआयडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सांगूनही त्याची दखल घेतली जात नाही. एमआयडीसीतील बहुतांशी रहिवासी वर्ग नोकरी, व्यवसायातील आहे. नोकरी, मुलांच्या शाळा सांभाळून रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही रहिवासी घरा लगतच्या कुपनलिकेतील पाणी स्वच्छता गृहात वापरून वेळ निभावून नेत आहेत.

हेही वाचा : टिएमटीचा पर्यावरणपुरक बस खरेदीवर भर, डबल डेकर बसगाड्या खरेदी प्रस्तावित, तिकीट दरात वाढ नाही

Badlapur citys only flyover again had large number of potholes
गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच, बदलापुरचा उड्डाणपुल पुन्हा खड्ड्यात; जोड रस्ते, चौकही कोंडीत
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Water supply disrupted in Pune city due to interrupted power supply Pune
खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत; महावितरणपुढे महापालिका हतबल
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pavana dam is 100 percent full
पिंपरी : शहरवासीयांची वर्षभराची चिंता मिटली, पवना धरण भरले शंभर टक्के
Water Supply Shutdown in Pune
Water Supply Shutdown in Pune : शहराचा पाणीपुरवठा होणार बंद, काय आहे कारण?
central mumbai, Low pressure water supply in Worli, Lower Parel, Curry Road area, marathi news, latest news
मध्य मुंबईत ठणठणाट; वरळी, लोअर परळ, करीरोड भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
dams, water supply Worli, Lower Paral,
धरणे कठोकाठ तरीही वरळीत ठणठणाट; वरळी, लोअर परळ, करीरोड येथे कमी दाबाने पाणीपुरवठा

एमआयडीसी भागात कधी नव्हे एवढी पाणी टंचाई आता सुरू झाली आहे. ही परिस्थिती आता असेल तर उन्हाळ्यात हे प्रमाण वाढण्याची भीती आहे. एमआयडीसीचा पाणी पुरवठा वाढवावा या मागणीसाठी अरविंद टिकेकर, अश्विनी पेंडसे, कनिका गद्रे, डाॅ. मनोहर अकोले, भारती मराठे, मिलिंद जोशी, ऋतुजा केतकर, डाॅ. मंजुषा पवार, चंद्रशेखर देव, भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे, प्रिया दामले, प्रकाश खरे, संजय गोगटे, महेश साटम, राजेश कोलापे, मुकुंद साबळे, राजीव देशपांडे, सागर पाटील यांनी एमआयडीसीचे उपअभियंता आनंद गोगटे यांची बुधवारी भेट घेतली. त्यांना एक निवेदन देऊन एमआयडीसी भागाचा पाणी पुरवठा पुरेशा दाबाने होईल अशी मागणी केली. कमी दाबाने पाणी पुरवठा का होतो याची पाहणी करून पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अधिकाऱ्याने रहिवाशांना सांगितले.