डोंबिवली : येथील औद्योगिक क्षेत्रातील भागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मुबलक पाणी येत नसल्याने रहिवासी हैराण आहेत. अनेक रहिवासी विकतचे पाणी आणून घरात वापरत आहेत. एमआयडीसी परिसरात नव्याने गृहसंकुले उभी राहत आहेत. या भागाचा पाणी पुरवठा त्या भागात वळविला जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी पाणी टंचाईची परिस्थिती यापूर्वी नव्हती. नवीन गृहसंकुले वाढल्यापासून हे प्रकार सुरू आहेत, असे रहिवाशांनी सांगितले. या कमी दाबाच्या पाणी टंचाई बाबत एमआयडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सांगूनही त्याची दखल घेतली जात नाही. एमआयडीसीतील बहुतांशी रहिवासी वर्ग नोकरी, व्यवसायातील आहे. नोकरी, मुलांच्या शाळा सांभाळून रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही रहिवासी घरा लगतच्या कुपनलिकेतील पाणी स्वच्छता गृहात वापरून वेळ निभावून नेत आहेत.

हेही वाचा : टिएमटीचा पर्यावरणपुरक बस खरेदीवर भर, डबल डेकर बसगाड्या खरेदी प्रस्तावित, तिकीट दरात वाढ नाही

what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Applicants disapproval due to prices for CIDCO preferred houses navi Mumbai news
२६ हजार घरे, १५ हजार अर्जदार; ‘सिडको’च्या पसंतीच्या घरांसाठी दरांमुळे नापसंती
corruption, ST , Nana Patole,
जनतेला लुटण्यापेक्षा एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा – नाना पटोले
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?
Increase in ST fares after elections are over is fraud with poor people Vijay Vadettiwar criticizes
निवडणूक होताच एसटीची दरवाढ, ही गरीब जनतेची लूट; विजय वडेट्टीवार यांची टीका
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

एमआयडीसी भागात कधी नव्हे एवढी पाणी टंचाई आता सुरू झाली आहे. ही परिस्थिती आता असेल तर उन्हाळ्यात हे प्रमाण वाढण्याची भीती आहे. एमआयडीसीचा पाणी पुरवठा वाढवावा या मागणीसाठी अरविंद टिकेकर, अश्विनी पेंडसे, कनिका गद्रे, डाॅ. मनोहर अकोले, भारती मराठे, मिलिंद जोशी, ऋतुजा केतकर, डाॅ. मंजुषा पवार, चंद्रशेखर देव, भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे, प्रिया दामले, प्रकाश खरे, संजय गोगटे, महेश साटम, राजेश कोलापे, मुकुंद साबळे, राजीव देशपांडे, सागर पाटील यांनी एमआयडीसीचे उपअभियंता आनंद गोगटे यांची बुधवारी भेट घेतली. त्यांना एक निवेदन देऊन एमआयडीसी भागाचा पाणी पुरवठा पुरेशा दाबाने होईल अशी मागणी केली. कमी दाबाने पाणी पुरवठा का होतो याची पाहणी करून पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अधिकाऱ्याने रहिवाशांना सांगितले.

Story img Loader