कल्याण : मुंबईकडून निघालेल्या गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बुधवारी सकाळी टिटवाळा रेल्वे स्थानक भागात बिघाड झाला. एक्सप्रेस जागीच खोळंबून राहिल्याने या एक्सप्रेसच्या मागे धावत असलेल्या कसारा लोकल आणि इतर एक्सप्रेस गाड्या शहाड, कल्याण रेल्वे स्थानक परिसरात खोळंबून राहिल्या.

सुमारे एक तास कसारा कडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातून शहापूर, कसारा, आडगाव भागात नोकरी निमित्त जाणाऱ्या नोकरदारांचे यामुळे हाल झाले. बराच उशीर लोकल एकाच जागी खळंबून राहिल्याने प्रवासी संतप्त झाले. कल्याणमधून भाजीपाला घेऊन जाणारे किरकोळ विक्रेतेही लोकलमध्ये अडकून पडले.

Central Railway
Central Railway : आता फुकटात एसी किंवा फर्स्ट क्लासने प्रवास करणं पडणार महागात; मध्य रेल्वेनं घेतला ‘हा’ निर्णय!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
eknath shinde
आमच्यामध्ये कोणताही श्रेयवाद नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

हेही वाचा : आमच्यामध्ये कोणताही श्रेयवाद नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच गीतांजली एक्सप्रेसचे लोको पायलट, टिटवाळा रेल्वे स्थानकातील तंत्रज्ञ यांनी एकत्रितपणे इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला. मुंबईकडे जाणारी लोकल सेवा मात्र सुरळीत होती. इंजिन मधील बिघाड दुरुस्त होत नसल्याने अखेर कल्याण कारशेड मधून नवीन इंजिन आणून ते गीतांजली एक्सप्रेसला जोडण्याचा निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला.

हेही वाचा : कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा

मुंबईहून कसाराकडे जाणारी एक लोकल कल्याण रेल्वे स्थानकात या कालावधीत रद्द करण्यात आली. ही लोकल कल्याण स्थानकातूनच पुन्हा सीएसएमटीकडे रवाना करण्यात आली. या लोकांचा कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना अचानक लाभ झाला.