कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका नवनियुक्त आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारून कामाला सुरूवात केली आहे. शहरातील रस्ते कामांचा आढावा घेऊन पाहाणी केली. तसेच नैमत्तिक, अर्जित रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या रजाही त्यांनी रद्द केल्या आहेत. रखडलेली विकास कामे आणि आरोग्य विषयावर सर्वाधिक भर देण्याचा मानस व्यक्त करत त्यादिशेने त्यांनी पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदी डाॅ. इंदूराणी जाखड यांची शासनाने शुक्रवारी नियुक्ती केली.

पालिकेच्या २८ वर्षाच्या कारकिर्दीत आयुक्त पदी विराजमान होणाऱ्या डाॅ. जाखड या पहिल्या महिला आयुक्त आहेत. त्यांनी शुक्रवारी आयुक्त पदाची सुत्रे हाती घेत कामाला सुरूवात केली. त्यांनी शहरात सुरू तसेच प्रस्तावित असलेल्या विकास कामांचा गेल्या तीन दिवसात आढावा घेतला. मागील काही महिन्यांपासून अनेक पालिका कर्मचारी, अधिकारी कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ची असतानाही सकाळी साडे दहा ते अकरा वाजता कार्यालयात येत होते. तो वर्ग सोमवारी सकाळी वेळेत कार्यालयात हजर होता. ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी नैमत्तिक, अर्जित रजा मंजूर करून घेतल्या आहेत. त्या सर्व रजा आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून सामान्य प्रशासन विभागाने रद्द केल्या आहेत.

Police officer beats up police inspector in nagpur
पोलीस निरीक्षकाला दिला कर्मचाऱ्याने चोप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mahakumbh :
Mahakumbh : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची एक घटना घडली की दोन? सखोल चौकशी करण्याची पोलिसांची माहिती
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Two wheeler theft on the rise in pune city
शहरबात : दुचाकी चोर, पोलिसांना शिरजोर!
mhada certificate required only for tdr says nashik municipal commissioner instructions to town planning department
केवळ टीडीआरसाठीच म्हाडा दाखल्याची गरज; मनपा आयुक्तांची नगररचना विभागाला सूचना
pimpri chinchwad police commissioner vinay kumar choubey on illegal money lending
पिंपरी : अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश

हेही वाचा : टीएमटीला जाहिरातींमधून मिळणार १२ कोटीचा महसुल; आठ वर्षानंतर निविदेला ठेकेदारांचा प्रतिसाद

आयुक्त डाॅ. जाखड शनिवारी पालिकेत येऊन कल्याण मधील रस्ते कामांचा आढावा घेतला. टिटवाळा ते हेदुटणे या २१ किमी बाह्यवळण रस्त्याचे काम १५ वर्षापासून सुरू असल्याचे ऐकून डाॅ. जाखड यांनी आश्चर्य व्यक्त केले. या रस्ते कामाविषयी शासन पातळीवर विचार केला जाईल, असे आयुक्तांनी सूचित केले. शहर स्वच्छता, आरोग्य विषयात कमतरता असता कामा नये, अशा इशाराही त्यांनी संबंधितांना दिला आहे. तसेच कल्याण पुर्वेतील काही रस्ते कामांचीही त्यांनी शनिवारी पाहाणी केली. विकास कामे का रखडली, हे सांगण्यापेक्षा तो विषय कसा मार्गी लागेल, यावर काम करावे. महिला बचत गटाच्या अधिकाधिक योजना राबवून हे गट सक्षम करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारी दिवसभर आयुक्त जाखड यांनी पालिकेतील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्याकडून पालिकेची आर्थिक परिस्थिती, स्वच्छता, बांधकाम, आरोग्य, प्रस्तावित विकास कामे याविषयी चर्चा केली. कल्याणमधील मधील संतोषी माता रस्त्यावरील बंगला माजी आयुक्तांकडून रिकामा होईपर्यंत मुंबईतून लोकलने कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत तेथून पालिका वाहनाने मुख्यालयात येण्याचा मनोदय डाॅ. जाखड यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

डाॅ. जाखड यांचा प्रवास

डाॅ. इंदूराणी जाखड या २०१६ च्या आयएएस तुकडीतील महाराष्ट्र संवर्गातील अधिकारी आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली येथे साहाय्यक जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रात गृहनिर्माण विभागात साहाय्यक सचिव काम केले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या.

“रखडलेले, प्रस्तावित विकास प्रकल्प मार्गी लावणे. सार्वजनिक स्वच्छता विषयांना आपले सर्वाधिक प्राधान्य असेल. नागरिकांना अपेक्षित असलेला शहर विकास सर्वांना सोबत घेऊन केला जाईल.” – डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानक भागातील लुटमारीच्या घटनांनी नागरिक हैराण

कल्याण डोंबिवली पालिका

“कडोंमपा हद्दीत विकास कामांचा उडालेला बोजवारा, आलेले बकालपण, वाहन कोंडी, अरूंद रस्ते पाहता डाॅ. जाखड यांना राजकीय मंडळींनी तीन वर्ष किंवा त्याहून अधिक चांगले काम करू द्यावे. प्रशासनातील वाढत्या हस्तक्षेपामुळे येथे कोणी टिकत नाही”, असे डोंबिवलीतील ज्येष्ठ वकील ॲड. शिरिष देशपांडे यांनी म्हटले आहे.

Story img Loader